शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मनपाच्या बससेवेला ‘डबलबेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:39 IST

शहराला स्मार्ट सिटी करण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहर बस वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार पाठबळ देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्याचबरोबर नाशिक शहराला आकार देण्याचे काम विकासकच करू शकतात, शहरातील गरिबांना घरे देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन करतानाच बांधकाम नियंत्रण व नियमन नियमावलीत (डीसीपीआर) मधील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक बोलवून विकासकांचा प्रश्न सोडविण्याची हमीही त्यांनी दिली आहे.

नाशिक : शहराला स्मार्ट सिटी करण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहर बस वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार पाठबळ देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्याचबरोबर नाशिक शहराला आकार देण्याचे काम विकासकच करू शकतात, शहरातील गरिबांना घरे देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन करतानाच बांधकाम नियंत्रण व नियमन नियमावलीत (डीसीपीआर) मधील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक बोलवून विकासकांचा प्रश्न सोडविण्याची हमीही त्यांनी दिली आहे.  बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेच्या वतीने गृहस्वप्नपूर्तीसाठी आयोजित केलेल्या शेल्टर २०१७ या प्रदर्शनाचा समारोप मंगळवारी (दि. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डोंगरे मैदानात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे व सीमा हिरे, डॉ. राहुल अहेर, महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण तसेच क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, क्रेडाईचे माजी राज्य अध्यक्ष अनंत राजेगावकर व शेल्टरचे मुख्य समन्वयक उदय घुगे उपस्थित होते.नाशिक शहर आपण दत्तक घेतले आहे, त्याचे स्मरण करून देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे शहर स्मार्ट कसे करता येईल यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यासह जे कोणी चांगले प्रस्ताव आणतील ते सर्व प्रस्ताव राज्य सरकार सकारात्मक पद्धतीने मंजूर केले जातील, असे प्रारंभीच स्पष्ट केले. नाशिक शहरात सध्या बससेवेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिवहन महामंडळ बससेवा चालविण्यास तयार नाही. नाशिक महापालिकेने ही बससेवा चालविण्याची तयारी केली असली तरी त्यासाठी अनेक अडचणी आहेत. परंतु शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य शासन महापालिकेला पाठबळ देईल यासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल, असेही ते म्हणाले. बससेवेसाठी अनेक नवे मॉडेल असून लीज लाइनवरही बस घेता येतील आणि त्यामाध्यमातून शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  नाशिक शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. विकासाला अत्यंत अनुकूल वातावरण असून, डेव्हलपरच शहरातील नाशिकला आकार देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला परवडणारी घरे करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची तयारी केली असून, त्याअंतर्गतच महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात साडेबारा लाख आणि शहरी भागात दहा लाख घरे बांधण्यात येणार आहे. सोलापूर येथे त्याअंतर्गत तीस हजार घरे बांधण्यात येणार असून, नागपूरला दहा हजार घरांचे काम करण्यात येणार आहे. नाशिक शहरातदेखील अशाप्रकारची कामे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू करण्याचे शिवधनुष्य विकासकांनी पेलावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचा स्टॉक तयार होऊ शकेल आणि गरजूंना परवडेल अशा पद्धतीने घरे उपलब्ध होऊ शकतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शहरात वायफाय हब नाशिक शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला असून, शहराला खºया अर्थाने स्मार्ट करण्यासाठी कल्पक विकासक योगदान देऊ शकतात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा मागे पडलेला विषय मार्गी लावण्यात येईल तसेच वायफाय हब तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीNashikनाशिक