शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:12 IST

नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतुकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझरभारतीय प्रजातीच्या वृक्षांची कत्तल शहरात होत राहिली तर ‘दिल्ली’ दूर नाही !

नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतुकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.महापालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेचा शेवट शनिवारी (दि.१८) झाला. यावेळी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबईनाकावरील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविल्यानंतर पालिकेच्या जेसीबीचालकांनी येथील वटवृक्षही जमीनदोस्त केला. या वटवृक्षाच्या बाबतीत पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे कुठलाही प्रस्ताव मांडलेला नव्हता. एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळ हटवून एकीकडे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली, तर दुसरीकडे पालिकेला उच्च न्यायालयाने वृक्ष संवर्धनाबाबत दिलेल्या आदेशाचा विसर पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वड प्रजातीची वृक्ष न्यायालयाच्या आदेशानंतरच हटविली जावी, असे असतानाही पालिकेकडून येथील वडाचे झाड तोडण्यात आले.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे मानव उत्थान मंचाचे जगबीर सिंग यांनी सांगितले. ...तर ‘दिल्ली’ दूर नाही !वटवृक्ष हा हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. या भागातून दिवस-रात्र हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी वटवृक्षाची भूमिका महत्त्वाची ठरत होती; मात्र महापालिकेच्या अधिकाºयांनी कुठलाही विचार न करता थेट वटवृक्षावर जेसीबी फिरविला. अशाप्रकारे भारतीय प्रजातीच्या वृक्षांची कत्तल शहरात होत राहिली तर ‘दिल्ली’ दूर नाही !