शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

मुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:12 IST

नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतुकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझरभारतीय प्रजातीच्या वृक्षांची कत्तल शहरात होत राहिली तर ‘दिल्ली’ दूर नाही !

नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतुकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.महापालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेचा शेवट शनिवारी (दि.१८) झाला. यावेळी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबईनाकावरील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविल्यानंतर पालिकेच्या जेसीबीचालकांनी येथील वटवृक्षही जमीनदोस्त केला. या वटवृक्षाच्या बाबतीत पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे कुठलाही प्रस्ताव मांडलेला नव्हता. एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळ हटवून एकीकडे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली, तर दुसरीकडे पालिकेला उच्च न्यायालयाने वृक्ष संवर्धनाबाबत दिलेल्या आदेशाचा विसर पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वड प्रजातीची वृक्ष न्यायालयाच्या आदेशानंतरच हटविली जावी, असे असतानाही पालिकेकडून येथील वडाचे झाड तोडण्यात आले.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे मानव उत्थान मंचाचे जगबीर सिंग यांनी सांगितले. ...तर ‘दिल्ली’ दूर नाही !वटवृक्ष हा हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. या भागातून दिवस-रात्र हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी वटवृक्षाची भूमिका महत्त्वाची ठरत होती; मात्र महापालिकेच्या अधिकाºयांनी कुठलाही विचार न करता थेट वटवृक्षावर जेसीबी फिरविला. अशाप्रकारे भारतीय प्रजातीच्या वृक्षांची कत्तल शहरात होत राहिली तर ‘दिल्ली’ दूर नाही !