शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

मुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:12 IST

नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतुकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझरभारतीय प्रजातीच्या वृक्षांची कत्तल शहरात होत राहिली तर ‘दिल्ली’ दूर नाही !

नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतुकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.महापालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेचा शेवट शनिवारी (दि.१८) झाला. यावेळी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबईनाकावरील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविल्यानंतर पालिकेच्या जेसीबीचालकांनी येथील वटवृक्षही जमीनदोस्त केला. या वटवृक्षाच्या बाबतीत पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे कुठलाही प्रस्ताव मांडलेला नव्हता. एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळ हटवून एकीकडे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली, तर दुसरीकडे पालिकेला उच्च न्यायालयाने वृक्ष संवर्धनाबाबत दिलेल्या आदेशाचा विसर पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वड प्रजातीची वृक्ष न्यायालयाच्या आदेशानंतरच हटविली जावी, असे असतानाही पालिकेकडून येथील वडाचे झाड तोडण्यात आले.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे मानव उत्थान मंचाचे जगबीर सिंग यांनी सांगितले. ...तर ‘दिल्ली’ दूर नाही !वटवृक्ष हा हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. या भागातून दिवस-रात्र हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी वटवृक्षाची भूमिका महत्त्वाची ठरत होती; मात्र महापालिकेच्या अधिकाºयांनी कुठलाही विचार न करता थेट वटवृक्षावर जेसीबी फिरविला. अशाप्रकारे भारतीय प्रजातीच्या वृक्षांची कत्तल शहरात होत राहिली तर ‘दिल्ली’ दूर नाही !