शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

नववीतील तेजसने बनवले बहुपर्यायी फवारणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:08 IST

सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असेच जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिक : सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असेच जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर बुधवार (दि.२५) पासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील तेजस काळे याने शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतºयांचे कष्ट आणि समस्या अतिशय जवळून पाहिल्या आहेत. ऐन बहरात असलेल्या पिकावर अचानक किडीचा प्रादुर्भाव होऊन ते भुईसपाट होताना आणि फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकºयांना जीव गमवावा लागतानाही कोवळ्या वयात बघितलेल्या तेजसने शेती क्षेत्रात काम करून शेतकºयांचे कष्ट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रयत्नातून तेजसने सायकलचे जुने टाकाऊ चाक, प्लॅस्टिक कॅन, प्लॅस्टिकचे नळ, टाकाऊ पाईपचे तुकडे, नोझल व पिस्टन सारखे साहित्य वापरून बहुउपयोगी फवारणी यंत्र तयार केले आहे. हे फवारणी यंत्र हाताळण्यास अतिशय सोपे असून महिलाही ते सहज वापरू शकतात. औषधाचा साठाही यंत्रावर फिरवणे शक्य असल्याने फवारणी यंत्र खांद्यावर घेण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकºयाचे खांद्यावरचे ओझे कमी होऊन त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे तेजस यंत्राची माहिती देताना सांगतो. शेतकºयाच्या घरात अगदी सहज उपलब्ध होणाºया साहित्यापासून या यंत्राची निर्मिती केली असल्याने त्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. फवारणी यंत्र शरीरापासून दूर व पुढे ढकलता येणारे असल्याने त्यापासून विषबाधा होण्याची शक्यता कमी असून, यंत्राचा देखभाल व दुरुस्तीचा खर्चही अत्यल्प असलेल्या या यंत्रामुळे कापूस, तूर, द्राक्ष, टमाटा व अन्य पालेभाज्या व फळभाज्यांना एकसारखी फवारणी करणे शक्य असल्याचा विश्वास लहानगा नवसंशोधक तेजस काळे याने व्यक्त केला आहे.शेत राखणीसाठी कटकटी यंत्रपीक कापणीला आले असताना जंगली प्राणी व पक्ष्यांपासून राखणी करण्यासाठी शेतकºयांना डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस राखण करावी लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन जळगावच्या बोदवड तालुक्यातील साळशिंग येथील प्रतापराव देशमुख यांनी जुना पत्र्यापासून बनवलेली फिरकी डब्याला जोडून कटकटी यंत्र तयार केले आहे. हवेच्या वेगाने फिरकी फिरून शेतात डबा वाजवल्याचा आवाज येत असल्याने शेतात उपद्रवी प्राणी-पक्षी फिरकत नसल्याने हे कटकटी यंत्र शेतकºयाचे पीक राखणीसाठी मदत करणारे असल्याचे देशमुख सांगतात.

टॅग्स :Studentविद्यार्थी