शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

नववीतील तेजसने बनवले बहुपर्यायी फवारणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:08 IST

सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असेच जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिक : सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असेच जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर बुधवार (दि.२५) पासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील तेजस काळे याने शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतºयांचे कष्ट आणि समस्या अतिशय जवळून पाहिल्या आहेत. ऐन बहरात असलेल्या पिकावर अचानक किडीचा प्रादुर्भाव होऊन ते भुईसपाट होताना आणि फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकºयांना जीव गमवावा लागतानाही कोवळ्या वयात बघितलेल्या तेजसने शेती क्षेत्रात काम करून शेतकºयांचे कष्ट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रयत्नातून तेजसने सायकलचे जुने टाकाऊ चाक, प्लॅस्टिक कॅन, प्लॅस्टिकचे नळ, टाकाऊ पाईपचे तुकडे, नोझल व पिस्टन सारखे साहित्य वापरून बहुउपयोगी फवारणी यंत्र तयार केले आहे. हे फवारणी यंत्र हाताळण्यास अतिशय सोपे असून महिलाही ते सहज वापरू शकतात. औषधाचा साठाही यंत्रावर फिरवणे शक्य असल्याने फवारणी यंत्र खांद्यावर घेण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकºयाचे खांद्यावरचे ओझे कमी होऊन त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे तेजस यंत्राची माहिती देताना सांगतो. शेतकºयाच्या घरात अगदी सहज उपलब्ध होणाºया साहित्यापासून या यंत्राची निर्मिती केली असल्याने त्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. फवारणी यंत्र शरीरापासून दूर व पुढे ढकलता येणारे असल्याने त्यापासून विषबाधा होण्याची शक्यता कमी असून, यंत्राचा देखभाल व दुरुस्तीचा खर्चही अत्यल्प असलेल्या या यंत्रामुळे कापूस, तूर, द्राक्ष, टमाटा व अन्य पालेभाज्या व फळभाज्यांना एकसारखी फवारणी करणे शक्य असल्याचा विश्वास लहानगा नवसंशोधक तेजस काळे याने व्यक्त केला आहे.शेत राखणीसाठी कटकटी यंत्रपीक कापणीला आले असताना जंगली प्राणी व पक्ष्यांपासून राखणी करण्यासाठी शेतकºयांना डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस राखण करावी लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन जळगावच्या बोदवड तालुक्यातील साळशिंग येथील प्रतापराव देशमुख यांनी जुना पत्र्यापासून बनवलेली फिरकी डब्याला जोडून कटकटी यंत्र तयार केले आहे. हवेच्या वेगाने फिरकी फिरून शेतात डबा वाजवल्याचा आवाज येत असल्याने शेतात उपद्रवी प्राणी-पक्षी फिरकत नसल्याने हे कटकटी यंत्र शेतकºयाचे पीक राखणीसाठी मदत करणारे असल्याचे देशमुख सांगतात.

टॅग्स :Studentविद्यार्थी