शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

औद्योगिक विकासाचा पाया असलेल्या एमएसएमई रोजगार देणारा स्त्रोत : अशुतोष राराविकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 16:37 IST

राष्ट्रीय उत्पन्नात 38 टक्के भाग हा सुक्ष्म, लघु व मध्येम स्वरुपाच्या उद्योगांचा देशात एकूण 5 कोटी एमएसएमई च्यामाध्यमातून 12 कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे

ठळक मुद्दे बँक आणि उद्योग यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हावेसरकार, बँका आणि उदयोग यांत संवाद आवश्यकबीबीएनजीच्या राष्ट्रीय परिषदेत रारावीकर यांचे प्रतिपादन

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात 38 टक्के भाग हा सुक्ष्म, लघु व मध्येम स्वरुपाच्या उद्योगांचा देशात एकूण 5 कोटी एमएसएमई च्यामाध्यमातून 12 कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निमितीसाठी सुक्ष, लघु व मध्यम उद्योगांना विवध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार अशुतोष राराविकर यांनी केले.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्राम्हण व्यावसायिकांच्या ब्राम्हण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) सातपूर येथे रविवारी (दि. 11) राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्यासग व्यासपीठावर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे आदी उपस्थित होते. राराविकर म्हणाले, देशातील लघुउद्योगांच्या विकासासाठी बँक आणि उद्योग यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हायला पाहिजे. यातूनच मोठया प्रमाणात विकास साधता येईल. सोबतच सरकार, बँका आणि उदयोग क्षेत्रतील विविध संघटना यांच्यात चांगला संवाद झाला तरच मोठ्या आणि लघु उद्योगात येणा:या अडचणीवर सहज मात करता येईल. उद्योजकांसाठी अनेक योजना असून अनेकदा या सर्व गोष्टी उद्योजकांना माहीत नसतात. त्यामुळे उद्योजकांच्या संघटनांनी ही त्रूटी दूर करण्याची गरज आहे. जे उदयोग अडचणीत आहेत त्यांना मदत करणो गरजेचे आहेत. त्यासाठी आरबीआयने बँकांना सुक्ष्ण व लघु उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच उदयोग संघटनांनी व्यवसाय क्लस्टर उभारून त्यातून कौशल्य विकासावर भर देत नवीन उदयोग व उद्योगावचा विस्तार करण्याचा सल्ला देतानाच नाशिकमध्ये संरक्षण, अन्न प्रक्रि या, शेती विषयक उदयोगास भरपूर वाव असून या क्षेत्रतील उद्योजकांना मोठया प्रमाणात संधी व सवलती उपलब्ध असल्याचे अशुतोष रावेरीकर यांनी अधोरेखित केले. आरबीआयच्या सूचनेनुसार एसएमई कॉर्नर सुरू करण्यात आले असून तीन दिवसात कर्ज उपलब्ध करून देण्याची यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

 

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकMIDCएमआयडीसी