शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

रामाच्या जीवनाचे संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनी भरला अधिवेशनात जोश

By दिनेश पाठक | Updated: January 23, 2024 13:24 IST

अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले. 

नाशिक :  खासदार संजय राऊत यांनी यांनी नाशिक येथे भरलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात आपल्या भाषणामध्ये श्रीराम याचे जीवनचरित्र वर्णन करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. देशाचे वातावरण राममय असताना महाशिबिराची ज्योत प्रज्वलित झाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. रामाशी शिवसेनेचे भावनिक नाते आहे. सर्वात जवळचे नाते शिवसेनेचे आहे. अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले. 

आजच्या अधिवेशनाचे ठिकाण धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र आहे. रामाने देखील अशाच जागांवर लढाया लढल्या हीच अवस्था आज शिवसेनेची असून राजकीय लढाई आम्हीच जिंकणार आहोत. रामाला  सर्वात जास्त संघर्ष नाशिकमध्ये अनुभवास आला परंतु रामाचे धैर्य, शौर्य व संयम हे तीन गुण होते म्हणून राम संघर्षावर मात करून विजयी मार्गावर गेला तेच धैर्य, शौर्य, संयम हे उद्धव ठाकरे व शिवसेनेत आहे. त्यामुळे आम्ही देखील विजयी पताका फडकवणारच असे सांगून राऊत यांनी समोर बसलेली आमची वानरसेना असल्याचा उल्लेख करत उपस्थित राज्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह भरला. 

सैनिक नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख आहे. रामाची लढाई नितीमत्तेसाठी होती हीच लढाई सध्या उद्धव ठाकरे लढत आहे. संघर्षातून कोणताही माणूस पुढे जातो हे देखील सांगून  राम अयोध्येत होता तेव्हा तो युवराज म्हणून वावरला परंतु जेव्हा तो वनवासात गेला तेव्हा तो राम झाला हे सांगताना राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना साहेब थांबा आपलेही दिवस पुन्हा येतील असा विश्वास दिला. रामाच्या काळामध्ये एकच रावण होता परंतु आता दिल्ली, मुंबईमध्ये सगळीकडे रावण निर्माण झाले आहेत, परंतु रावणाला देखील रामाकडून पराजित व्हावे लागले होते दिल्लीतील रावणाचा देखील एक दिवस पराभव होईल, असे सांगून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले. 

कोण आले नरेंद्र मोदी, कोण आले अजित पवार. राम म्हणतात जे ईश्वराने निर्माण केले ते माझे भाग्य आहे त्यामुळे अजीत पवार, फडणवीस, शिंदे अरे थोडे थांबा काळ येईल आमचा. आम्ही तुम्हाला गाडूच. उद्धव साहेब घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहेत या सगळ्या रावणाचा पराभव आपण करूच. राम म्हणतात जे ईश्वराने निर्माण केले ते माझे भाग्य आहे. त्यामुळे घाबरू नका आपण जिंकूच असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत