शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

तीन दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन

By admin | Updated: October 9, 2015 00:16 IST

येवला : नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

येवला : शहराला पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करावा, या मागणीसाठी तिघा नागरिकांनी येवला पालिकेसमोर बुधवारी उपोषण केले. येवल्याचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर तक्ते, संजय जाधव, अशोक संकलेचा हे तिघेजण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, पाटबंधारे खात्याशी विचारविनिमय करून, पाण्याचा अंदाज घेऊन, येवला नगरपरिषद पाणीपुरवठा समितीच्या विचार- विनिमयाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे व मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी बुधवारी रात्री उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्याने माजी नगराध्यक्ष रत्नाकर तक्ते यांच्यासह तिघांनी उपोषण मागे घेतले. येवला पालिकेला आठ दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याबाबत निवेदन दिले होते. तालुक्यात परतीच्या पावसाने धरणात पाणी साठ पुरेसा आहे.शिवाय पालखेड चे पाणी आवर्तनाने साठवण तलाव देखील भरला आहे. अशा परिस्थितीत पालिकेने 3 दिवसाआड करावा, अश्ी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. घटस्थापना, दसरा, दिवाळी या सनासुदीच्या दिवसात शहरवासियांना पुरेसे पाणी मिळावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे. साठवण तलावा भोवती असलेल्या १०९ विहिरी मधून पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर होत असून तो थांबविण्याची मागणीही होत आहे. तसेच परिसरातील विहिरीवरील थ्री फेज विजेचे कनेक्शन तत्काळ बंद करावे, विहिरी अधिग्रहित कराव्यात अशी मागणी अशोक संकलेचा सह उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. दिवसभरात या उपोषणस्थळी पदाधीकारी न आल्यामुळे उपोषणकर्त्यानी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)