शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

सेझचे धोरणच बदलायच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:34 IST

सिन्नर येथील रतन इंडियाच्या पॉवर प्रोजेक्टमध्ये वीजनिर्मिती होत असतानाही शासनाने वीज खरेदी न केल्याने निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तोडगा काढण्यापेक्षा सरकार सेझबद्दलचे धोरणच बदलत चालल्याचे वृत्त आहे. उद्योगमंत्र्यांनी नाशिक येथे तसे सूतोवाचही केले होते. मात्र त्यामुळे सेझचे भवितव्य संकटात येईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

नाशिक : सिन्नर येथील रतन इंडियाच्या पॉवर प्रोजेक्टमध्ये वीजनिर्मिती होत असतानाही शासनाने वीज खरेदी न केल्याने निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तोडगा काढण्यापेक्षा सरकार सेझबद्दलचे धोरणच बदलत चालल्याचे वृत्त आहे. उद्योगमंत्र्यांनी नाशिक येथे तसे सूतोवाचही केले होते. मात्र त्यामुळे सेझचे भवितव्य संकटात येईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. सरकारांच्या धोरणातील धरसोड प्रकारामुळे नाशिकसारख्या ठिकाणी भविष्यात अशा प्रकारचे बडे उद्योग इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे धाडस करतील काय, अशीदेखील शंका स्थानिक उद्योजक व्यक्त करीत आहेत.  केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत नाशिकमध्ये इंडिया बुल्स कंपनीला सिन्नर येथे सेझसाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी इगतपुरी तालुक्यातदेखील अशाच प्रकारे सेझ मंजूर करण्यात आला होता. परंतु स्थानिक नागरिकांचा विरोध आणि त्याला राजकीय पाठबळ मिळाल्याने तो रद्द करण्यात आला. त्यावेळी जागा देण्यास विरोध असे एकमेव कारण पुढे आले होते.  मात्र रोजगाराचे महत्त्व ओळखून सिन्नर तालुक्यात मात्र प्रतिसाद मिळाला आणि अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्याचे ठरविण्यात आले. इंडिया बुल्स आणि रतन इंडिया वेगळे झाल्यानंतरदेखील १३५० मेगावॉटचा प्रकल्प पूर्ण झाला. परंतु नंतर सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आता पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्यावर ताबा घेतला आहे. केंद्राने जेव्हा एसईझेडबाबत धोरण ठरविले तेव्हा विदेशातील धर्तीवर भारतात हे धोरण यशस्वी होईल काय? याविषयी शंका घेतल्या जात होत्या. परंतु देशातील मोजक्या ठिकाणांबरोबरच नाशिकमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु आता हे चित्र बदलले असून, हा पॉवर प्रोजेक्टमुळे संपूर्ण सेझच अडचणीत आला आहे.विशेष म्हणजे, रतन इंडियाच्याच अमरावती प्रकल्पातून सरकार वीज खरेदी करीत असताना नाशिकविषयी वावडे का, असा प्रश्नदेखील केला जात आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रसारख्या घोषणा करीत असताना दुसरीकडे अशा प्रकारचे धोरण घेणे हे विसंगत असल्याचे मतदेखील उद्योजक व्यक्त करीत आहेत. परंतु आता सेझबाबतचे धोरणच बदलण्याच्या हालचाली केंद्रातील सरकार करीत आहेत.  मध्यंतरी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सिन्नर येथे उद्योजकांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी कार्यान्वित न झालेल्या सेझसाठी केंद्र सरकारकडून एकात्मिक उद्योग विकास प्रकल्पाचा प्रस्ताव असल्याचे नमूद केले होते. त्यामुळेच आता नवीन धोरणातच गुळवंच आणि मुसळगाव येथील आरक्षित जमिनी डी नोटीफाइड म्हणजेच अवर्गीकृत करण्याच्या हालचाली सुरू होण्याची उद्योजकांना भीती आहे. तसे झाले तर संपूर्ण प्रकल्पाचेच भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. तथापि, नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता अशा प्रकारचे फेरबदल मोठ्या उद्योगांना परवडणारे नाही  आणि त्यामुळे भविष्यात बडे  उद्योग सेझसारख्या धोरणांतर्गत गुंतवणूक करण्यास धजावणार  नाहीत, असेही मत उद्योजकांनी व्यक्त केले. (समाप्त)

टॅग्स :MIDCएमआयडीसी