शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गतिरोधकांवर होतेय वाहनांची आदळआपट

By admin | Updated: September 1, 2015 23:09 IST

गतिरोधकांवर होतेय वाहनांची आदळआपट

वडाळारोड : प्रमाणापेक्षा अधिक उंचीनाशिक : वडाळारोडवरील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अलीकडे महापालिकेच्या वतीने दुतर्फा गतिरोधक बसविण्यात आले आहेत; मात्र या गतिरोधकांची उंची प्रमाणापेक्षा अधिक असल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, गतिरोधकांची उंची कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.वडाळा चौफु ली ते उर्दू शाळेपर्यंत मुख्य वडाळा रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसून केवळ या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधकांचा आगाऊ अंदाज येत नसल्याने वाहने आदळू लागली आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून, तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने होणाऱ्या वाहतुकीला गतिरोधकांमुळे लगाम बसला आहे; मात्र अपघात टाळण्याचा उद्देश अपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. कारण गतिरोधकाची प्रमाणापेक्षा अधिक उंची, गतिरोधक लक्षात यावे यासाठी अलीकडे झेब्रा पट्ट्यांचा अभाव, गतिरोधक ांवर रेडियम बसविण्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष अशा कारणांमुळे गतिरोधकांची सोयऐवजी गैरसोयच अधिक होत आहे. एक ापाठोपाठ तीन गतिरोधक बसविले आहे. उंची अधिक असल्यामुळे दुचाकी, तीनचाकी वाहनांना गतिरोधक ओलांडताना अपघात होत आहेत. कारण वाहनांचा वेग पूर्णत: कमी करण्याशिवाय पर्याय नसतो, अशावेळी तोल जाऊन पडण्याचा धोका निर्माण होतो. मागील वाहन भरधाव वेगाने थेट गतिरोधक ओलांडणाऱ्या वाहनाजवळ येऊन थांबते. त्यामुळे मागून येणारी वाहने पुढील वाहनांवर धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे नाही. (प्रतिनिधी)वडाळा चौफुलीवर हवे गतिरोधकमागील अनेक महिन्यांपासून वडाळा चौफुलीच्या प्रारंभी वडाळा-डीजीपीनगर-साईनाथनगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक टाकण्याची मागणी केली जात आहे. मात्र या मागणीकडे पोलीस व पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.