शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
5
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
6
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
7
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
9
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
10
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
11
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
12
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
13
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
14
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
17
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
19
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
20
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा

माता, बालमृत्यू घटनांवरून केंद्रीय मंत्री संतापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 01:51 IST

शासनाच्या अनेकविध योजना असतानाही रुग्णालयांमध्ये माता, बालमृत्यू घडत असतील तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे. ज्यांना कामे करण्यास जमत नाहीत, त्यांनी नोकरी सोडून द्यावी, असे सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देआढावा बैठक : कामे जमत नसतील तर नोकऱ्या सोडा

नाशिक : शासनाच्या अनेकविध योजना असतानाही रुग्णालयांमध्ये माता, बालमृत्यू घडत असतील तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे. ज्यांना

कामे करण्यास जमत नाहीत, त्यांनी नोकरी सोडून द्यावी, असे सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बुधवारी (दि. ६) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधडीया, जिल्हा आरोग्य अधिकारी (जि. प.) डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे उपस्थित होते.

माता आणि बालमृत्यू होत असतील तर हे आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे. गेल्या दोन महिन्यांत ९२ बालकांचा मृत्यू झाला असेल तर आरोग्य यंत्रणेत मोठा निष्काळजीपणा झाला असल्याचे दिसून येते. जिल्हा रुग्णालयातील कारभाराच्या अनेक तक्रारी आहेत. त्यात अजूनही सुधारणा झालेली नाही. येथील कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेचे ट्रेनिंग देण्याची गरज असल्याचे पवार यांनी संतप्तपणे सांगितले. रुग्णसेवा ही आरोग्य सेवा असतानाही जिल्हा रुग्णालयात असे घडत नसेल तर येथे मनमानी सुरू असल्याचे दिसते, असेही पवार म्हणाल्या. ज्यांना कामे जमत नसतील त्यांनी कामे सोडून द्यावीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

आरोग्य कर्मचारी, नर्स, डाक्टर्स यांचे ट्रेनिंग घेण्याची वेळ आली असल्याचे सांगून पवार यांनी डॉक्टरांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले जाणार असल्याचे सांगितले. काही डॉक्टर्स डिलिव्हरी करण्यास वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नसतील तर त्यांची यादी तयार करावी, असे आदेश देतानाच पवार यांनी डॉक्टरांच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. माता-बालमृत्यू कसे घडले याचा देखील अहवाल त्यांनी मागविला. सन २०२१-२२ मध्ये ६५६, तर सन २०-२१ मध्ये ७०० बालकांचा मृत्यू झाला. आता तर दोन महिन्यांतच ९२ बालकांचा मृत्यू होणे गंभीर असल्याचे पवार यांनी सांगितले.

--इन्फो--

आदिवासी आयुक्तांना बजावणार नोटीस

या बैठकीत केंद्रीय मंत्री पवार यांनी आदिवासी विभागाच्या केंद्रीय आदिवासी विकास योजनेबाबत विचारणा केली असता, आदिवासी विकास विभागाला केंद्राच्या कोणत्याही योजनांची माहिती नसल्याने भारती पवार यांनी आदिवासी आयुक्तांना नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य