शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

माता, बालमृत्यू घटनांवरून केंद्रीय मंत्री संतापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 01:51 IST

शासनाच्या अनेकविध योजना असतानाही रुग्णालयांमध्ये माता, बालमृत्यू घडत असतील तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे. ज्यांना कामे करण्यास जमत नाहीत, त्यांनी नोकरी सोडून द्यावी, असे सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देआढावा बैठक : कामे जमत नसतील तर नोकऱ्या सोडा

नाशिक : शासनाच्या अनेकविध योजना असतानाही रुग्णालयांमध्ये माता, बालमृत्यू घडत असतील तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे. ज्यांना

कामे करण्यास जमत नाहीत, त्यांनी नोकरी सोडून द्यावी, असे सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बुधवारी (दि. ६) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधडीया, जिल्हा आरोग्य अधिकारी (जि. प.) डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे उपस्थित होते.

माता आणि बालमृत्यू होत असतील तर हे आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे. गेल्या दोन महिन्यांत ९२ बालकांचा मृत्यू झाला असेल तर आरोग्य यंत्रणेत मोठा निष्काळजीपणा झाला असल्याचे दिसून येते. जिल्हा रुग्णालयातील कारभाराच्या अनेक तक्रारी आहेत. त्यात अजूनही सुधारणा झालेली नाही. येथील कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेचे ट्रेनिंग देण्याची गरज असल्याचे पवार यांनी संतप्तपणे सांगितले. रुग्णसेवा ही आरोग्य सेवा असतानाही जिल्हा रुग्णालयात असे घडत नसेल तर येथे मनमानी सुरू असल्याचे दिसते, असेही पवार म्हणाल्या. ज्यांना कामे जमत नसतील त्यांनी कामे सोडून द्यावीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

आरोग्य कर्मचारी, नर्स, डाक्टर्स यांचे ट्रेनिंग घेण्याची वेळ आली असल्याचे सांगून पवार यांनी डॉक्टरांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले जाणार असल्याचे सांगितले. काही डॉक्टर्स डिलिव्हरी करण्यास वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नसतील तर त्यांची यादी तयार करावी, असे आदेश देतानाच पवार यांनी डॉक्टरांच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. माता-बालमृत्यू कसे घडले याचा देखील अहवाल त्यांनी मागविला. सन २०२१-२२ मध्ये ६५६, तर सन २०-२१ मध्ये ७०० बालकांचा मृत्यू झाला. आता तर दोन महिन्यांतच ९२ बालकांचा मृत्यू होणे गंभीर असल्याचे पवार यांनी सांगितले.

--इन्फो--

आदिवासी आयुक्तांना बजावणार नोटीस

या बैठकीत केंद्रीय मंत्री पवार यांनी आदिवासी विभागाच्या केंद्रीय आदिवासी विकास योजनेबाबत विचारणा केली असता, आदिवासी विकास विभागाला केंद्राच्या कोणत्याही योजनांची माहिती नसल्याने भारती पवार यांनी आदिवासी आयुक्तांना नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य