शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सत्ताधाऱ्यांनी केला सत्तेचा सर्वाधिक दुरुपयोग ! :शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 02:14 IST

कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुणीच केला नव्हता. असा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा, असा घणाघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.

ठळक मुद्देमखमलाबाद, सिडको येथे जाहीरसभा

नाशिक : कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुणीच केला नव्हता. असा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा, असा घणाघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.सिडकोतील पवननगरला नाशिक पश्चिमचे राष्टÑवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे, उमेदवार डॉ. अपूर्व हिरे, देवीदास पिंगळे, नाना महाले, जयवंत जाधव, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, गजानन शेलार, लक्ष्मण जायभावे, अर्जुन टिळे, डॉ. शोभा बच्छाव, करण गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. बोलताना पवार यांनी यावेळी १९८५ सालासारखी परिस्थिती दिसत असून, यावेळीदेखील संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. राज्य आणि केंद्र सरकारने सामान्य जनतेची कोणतीच कामे केली नाहीत. त्यामुळेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच मग कलम ३७० सारख्या मुद्द्यांचा वापर केला जात असल्याचे पवार यांनी नमूद केले.गत ५ वर्षांत १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली. ज्या शेतकºयांची २-४ लाखांची कर्ज थकतात, त्यांना नोटिसा पाठवून बेअबु्र करता आणि कोट्यवधींची उद्योजकांची कर्जे, राष्टÑीयीकृत बॅँकांची देणी माफ करून टाकता हा सामान्यांवर मोठा अन्याय आहे. तो बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याआधी भुजबळ यांनीदेखील राज्याच्या कारभारावर घणाघाती हल्ला चढवला. तसेच या सरकारने केवळ खोटी आश्वासने देण्याचे काम केले असल्याचा आरोप केला. तर अपूर्व हिरे यांनी एचएएल, स्थानिक बेरोजगारीच्या मुद्द्यांमुळे परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.दत्तक बापापेक्षा गरीब बाप बरा...मखलाबाद येथे झालेल्या सभेत देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. शहर दत्तक घेऊन कोणतेही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही काम केले नाही. नाशिकमधील उद्योगधंदे बंद पडले असून, उद्योजक, कामगार, शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले असताना यासंबंधी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की ते देशभक्तीच्या घोषणा देऊन मुद्द्यांवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा परक्या दत्तक बापापेक्षा आपला गरीब बापच बरा, अशी टीका पवार यांनी केली. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. आमचा रेवड्यांची कुस्ती खेळणारा पोरगंही त्यांना सरस ठरेल, असं असताना मुख्यमंत्री म्हणतात त्यांना समोर कोणी पहिलवानच दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली. आपण काहीच केले नाही अशी टीका सध्या केली जाते मग पन्नास-पंचावन्न वर्षात काही तरी काम केले असल्यानेच सरकारने आपल्याला पद्म पुरस्कार दिला असेल ना असेही ते म्हणाले.हिरे घराण्याकडे सेवेचा वारसाभाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांतदादा हिरे असा समाजसेवेचा मोठा वारसा हिरे घराण्याकडे आहे. स्वत: अपूर्व यांनीदेखील विधीमंडळात नाशिक जिल्ह्याचे अनेक प्रश्न मांडण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे यावेळी सेवेचा वारसा असलेला उमेदवार निवडण्याची संधी तुम्हाला असल्याचे सांगून पवार यांनी अपूर्व यांना विजयी करण्याचे आवाहन केले.गोदाकाठी गाजरविक्रीछगन भुजबळ यांनी यावेळी नेहमीच्या शैलीत सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गोदाकाठी भाजीबाजार मैदानावर होत असल्याचा संदर्भ घेऊन भुजबळ यांनी नाशिकचा बाजार नेहमी बुधवारी भरतो, मात्र आज चक्क गुरुवार असताना देखील गोदाघाटावर बाजार भरला आहे. या बाजारात गाजर विक्री सुरू आहे, असे सांगून फडणवीस यांच्या सभेची खिल्ली उडवली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस