शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

नाशिक विभागाचा मृत्युदर २ तर जिल्ह्याचा २.११ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 01:13 IST

विभागात आतापर्यंत ९लाख ७१ हजार १२५ रुग्णांपैकी ९ लाख ४५ हजार १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के तर मृत्युदर २ टक्के असून नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर २,११ टक्के आहे.

ठळक मुद्देविभागात ९ लाख ४५ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त; विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के

नाशिक : विभागात आतापर्यंत ९लाख ७१ हजार १२५ रुग्णांपैकी ९ लाख ४५ हजार १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के तर मृत्युदर २ टक्के असून नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर २,११ टक्के आहे.

विभागात आतापर्यंत १९ हजार ४९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के असल्याचे आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी सांगितले. नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ६५ लाख ४९ हजार ३७५ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ९ लाख ७१ हजार १२५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

इन्फो

नाशिकला कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६५ टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ६ हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ लाख ९७ हजार ४४९ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९२९ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के आहे. आजपर्यंत ८ हजार ६०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे.

 

इन्फो

नंदुरबारला सर्वाधिक मृत्युदर

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ४० हजार १३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे. आजपर्यंत २ हजार ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.८० टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर विभागात सर्वाधिक म्हणजे २.३६ टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार १९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९ हजार २३३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के असून आतापर्यंत ९५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इन्फो

धुळ्यात सर्वात चांगली स्थिती

विभागातील धुळे जिल्ह्यात कोरोनामुक्ततेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९८.४१ टक्के तर जिल्ह्याचा मृत्युदर सर्वात कमी १.४५ टक्के आहे. नगर जिल्ह्यात कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९६.३६ टक्के तर मृत्युदर १.९९ टक्के आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या