शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
3
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
4
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
5
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
6
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
7
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
8
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
9
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
10
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
11
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
12
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
13
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
14
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
15
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
16
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
17
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
18
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
19
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

कांदा अनुदानासाठी आणखी पंधरा दिवस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 7:20 PM

जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याचे भाव सप्टेंबर अखेरपासूनच घसरण्यास सुरुवात झाली. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा अक्षरश: मातीमोल भावात शेतक-यांना विक्री करावा लागला. अनेक शेतक-यांना कांद्याच्या वाहतुकीचा खर्चदेखील निघाला नाही

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : ३१ डिसेंबरपर्यंत विक्रीची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कांदा दरात झालेली घसरण व त्यातून गावोगावी सरकारविरुद्ध शेतक-यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांना क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेत त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाच पात्र ठरविले. परंतु आता त्या मुदतीत आणखी पंधरा दिवसांनी वाढ करण्यात आली असून, नवीन निर्णयानुसार ३१ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही सरकारच्या या मदतीचा लाभ दिला जाणार आहे.

जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याचे भाव सप्टेंबर अखेरपासूनच घसरण्यास सुरुवात झाली. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा अक्षरश: मातीमोल भावात शेतक-यांना विक्री करावा लागला. अनेक शेतक-यांना कांद्याच्या वाहतुकीचा खर्चदेखील निघाला नाही, तर अनेकांनी चाळीतच कांदा ठेवणे पसंत केले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होऊन कांदा विक्रीचे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना मनिआॅर्डरने पाठवून राग शमविण्याचा प्रयत्न केला. गावोगावी रस्त्यावर कांदा ओतून आंदोलने होत असल्याने आगामी निवडणूक लक्षात घेता, सरकारने शेतकºयांना आपलेसे करण्यासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात कांदाविक्री केलेल्या शेतक-यांना क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा व दोनशे क्विंटलपर्यंत विक्री केलेल्या कांद्यालाच ते देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतक-यांकडून कांदा विक्रीच्या पावत्या, पीकपेरा, सातबारा उतारा व बॅँकेचे खाते क्रमांकाची माहिती सहकार विभागाला सादर करण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे ७२ हजार शेतक-यांनी आपली माहिती सहकार विभागाला सादर केली असून, शेतक-यांनी सादर केलेल्या माहितीची छाननी केली जात असतानाच, गुरुवारी राज्य सरकारने पुन्हा शेतक-यांना दिलासा देण्यासाठी १५ डिसेंबरऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ डिसेंबरनंतर कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही आता याचा लाभ मिळणार आहे.

चौकट===सरकारने मुदतवाढ दिली असली तरी, १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात पंधरा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या दिवाळी सणामुळे बंद होत्या. त्यामुळे शेतक-यांसाठी कांदा विक्रीसाठी कमी कालावधी मिळाला. मुळात आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली कांदा घसरण जानेवारीपर्यंत कायम असून, सरकारचा विशिष्ट कालावधीसाठी अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.- राजेंद्र डोखळे, शेतकरी नेते

टॅग्स :onionकांदाNashikनाशिकagricultureशेती