शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

शहरात आणखी पाणीकपात अटळ

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

जलसंकटाबद्दल महासभेत चिंता : आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंदचे संकेत

नाशिक : गंगापूर धरणातील पाणीसाठा मराठवाड्याला सोडण्याच्या निर्णयामुळे शहरातील जलसंकट दिवसेंदिवस आणखी भीषण होत चालले असून, मे २०१६ अखेर धरणातील पाण्याची पातळी अवघ्या दहा फुटावर जाणार असल्याचे वास्तव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महासभेत मांडल्याने लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रशासनानेही आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. नाशिकमध्ये पहिल्यांदाच उद्भवलेल्या या जलसंकटावर मात करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे अधिकार महापौर अशोक मुर्तडक यांनी आयुक्तांकडे सोपवले आणि पाणीबचतीसाठी प्रबोधन करण्याबरोबरच नाशिककरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांकरिता लागणारा खर्च मनपा निधीतून करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत प्रशासनाने मांडला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच पाणीपुरवठा विभागाने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती दर्शविणारे महासभेला दिलेले पत्र वाचून दाखविण्यात आले आणि जून-जुलैमध्ये ओढवणाऱ्या भीषण पाणीसंकटाची चाहूल सदस्यांना लागली. १४ मार्च २०१६ पूर्वी गंगापूर धरणात १८१० दलघफू म्हणजे ३२.१४ टक्के पाणीसाठा असून धरणसमूहात २४०३ दलघफू म्हणजे २५.६६ टक्के साठा आहे. महापालिकेने ३३०० दलघफू आरक्षणापैकी आतापर्यंत १८४२ दलघफू पाण्याचा वापर केला आहे, तर गंगापूर आणि दारणामिळून १४५७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. ३१ जुलैपर्यंत १३८ दिवसांसाठी मनपाला प्रतिदिन २९९ दशलक्ष लिटर्स (१०.५६ दलघफू) पाणीपुरवठा करावा लागणार आहे.