शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आणखी पाणीकपात अटळ

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

जलसंकटाबद्दल महासभेत चिंता : आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंदचे संकेत

नाशिक : गंगापूर धरणातील पाणीसाठा मराठवाड्याला सोडण्याच्या निर्णयामुळे शहरातील जलसंकट दिवसेंदिवस आणखी भीषण होत चालले असून, मे २०१६ अखेर धरणातील पाण्याची पातळी अवघ्या दहा फुटावर जाणार असल्याचे वास्तव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महासभेत मांडल्याने लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रशासनानेही आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. नाशिकमध्ये पहिल्यांदाच उद्भवलेल्या या जलसंकटावर मात करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे अधिकार महापौर अशोक मुर्तडक यांनी आयुक्तांकडे सोपवले आणि पाणीबचतीसाठी प्रबोधन करण्याबरोबरच नाशिककरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांकरिता लागणारा खर्च मनपा निधीतून करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत प्रशासनाने मांडला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच पाणीपुरवठा विभागाने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती दर्शविणारे महासभेला दिलेले पत्र वाचून दाखविण्यात आले आणि जून-जुलैमध्ये ओढवणाऱ्या भीषण पाणीसंकटाची चाहूल सदस्यांना लागली. १४ मार्च २०१६ पूर्वी गंगापूर धरणात १८१० दलघफू म्हणजे ३२.१४ टक्के पाणीसाठा असून धरणसमूहात २४०३ दलघफू म्हणजे २५.६६ टक्के साठा आहे. महापालिकेने ३३०० दलघफू आरक्षणापैकी आतापर्यंत १८४२ दलघफू पाण्याचा वापर केला आहे, तर गंगापूर आणि दारणामिळून १४५७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. ३१ जुलैपर्यंत १३८ दिवसांसाठी मनपाला प्रतिदिन २९९ दशलक्ष लिटर्स (१०.५६ दलघफू) पाणीपुरवठा करावा लागणार आहे.