शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

नाशिकच्या 72 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:33 IST

दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे.

ठळक मुद्देदहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणीएक हजार 32 नोंदणीकृत शाळांमध्ये परीक्षा

नाशिक : करिअरमधील महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या वर्गाकडे पाहिले जाते. अशा दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण ११०८ शाळांपैकी सुमारे १०३२ शाळांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून, ८९ हजार ३२६ विद्यार्थ्यांपैकी ७२ हजार ७९२५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत परीक्षा दिली आहे. अजूनही अनेक काही शाळांनी विद्यार्थ्यांची चाचणी घेतलेली नाही, अशा शाळांनी तत्काळ कलमापन व अभिक्षमता चाचणी पूर्ण करण्याच्या सूचना नाशिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जिल्हातील शाळांना केल्या आहेत. जिल्हाभरातील विविध शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची २९ डिसेंबर २०१९ पासून कलमापन व अभिक्षमता चाचणीला सुरुवात झाली असून, महाकरिअर मित्र अ‍ॅपद्वारे आॅनलाइन घेतली जाणारी ही चाचणी १८ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. कलचाचणी मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी ‘महाकरिअर मित्र’ अ‍ॅप सुरू करण्यात आले असून,  चाचणी परीक्षेसाठी गुगल प्लेस्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइल अ‍ॅपद्वारे कलचाचणी देता येणार नाही, त्यांना संगणकाच्या मदतीनेही कलचाचणी देता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या असून, या परीक्षांच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी कलचाचणीची मदत होते. यात कलचाचणीद्वारे कृषी, कला व मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आदी क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा असलेला कल जाणून घेतला जातो, तर अभिक्षमता चाचणीद्वारे भाषिक, तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय अशा चार क्षमतांची चाचणी घेण्यात येणार असल्याचे विभाग समन्वयक डॉ. बाबासाहेब बडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थी