शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पांगरीत शेतकरी संघटनेचा वीज कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 22:51 IST

पांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने पांगरी येथील शेतकरी संघटनेने वावी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हिरावून घेऊ नका, अशी मागणी करीत पांगरी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वावी सहायक अभियंता यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देनिवेदन : वीज कनेक्शन तोडू नका, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा

पांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने पांगरी येथील शेतकरी संघटनेने वावी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हिरावून घेऊ नका, अशी मागणी करीत पांगरी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वावी सहायक अभियंता यांना निवेदन दिले.महावितरण कंपनीने थकबाकी वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून बिल वसुली करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जोमात आलेली पिके पाण्याअभावी जळून जाण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेने महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला व तत्काळ वीजपुरवठा जोडणी करून द्यावी, अन्यथा येथील शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदानाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आत्माराम पगार, कृष्णा घुमरे, बारकू पगार, बाबासाहेब पांगारकर, रामदास पगार, गणेश डुकरे, रामदास डुकरे, बाबासाहेब कलकत्ते, आनंदा वारुळे, सोमनाथ पांगारकर, जगन्नाथ पगार, किसन वारुळे, पुंजाहरी पगार, बबन डुकरे, सुभाष डुकरे आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.वीज वितरण कंपनीने दरवर्षी पाच हजार रुपये वीजबिल वसुली करावी तसेच महावितरण कंपनीने मागील दहा वर्षांपूर्वी जे शेतकऱ्यांना अनाठायी वीजबिल दिले आहेत ते कमी करावे.- आत्माराम पगार, तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटना 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी