शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

आई मला शाळेत जायचं नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST

नाशिक : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही ...

नाशिक : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू होणार आहेत. परंतु, जवळपास दहा महिन्यांपासून शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी विविध कारणांमुळे नकारघंटा सुरू असून सातवी, आठवीतील काही विद्यार्थी वगळता पाचवी सहावीचे विद्यार्थी मात्र ‘आई मला शाळेत जायचे नाही’ असा हट्ट करीत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा आलेख घसरल्याने ४ जानेवारीपासून जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून शाळेत येणारे विद्यार्थीही सुरक्षित आहेत. त्यामुळे आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व तयारीही केली आहे. मात्र, कोरोनाच्या सुुरुवातीच्या काळात मुलांनी घराबाहेर पडू नये, यासाठी आईवडिलांनींच मुलांना सांगितलेली बाहेर कोरोना आहेसारखी वाक्ये आता मुलांच्या तोंडी असून जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असतानाही कोरोनाचे कारण देत विद्यार्थी शाळेत जाण्याचा विषय टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पॉइंटर-

पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या

पाचवी - १,२२, ७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी -१,१५,९१०

बाहेर कोरोना आहे, विद्यार्थी देताहेत कारण

- पाचवी-सहावीतील विद्यार्थ्यांची बाहेर कोरोना असल्याचे कारण देत शाळेसाठी नकार घंटा सुरू आहे.

- काही विद्यार्थी शाळेसाठी उत्सुक आहेत, परंतु, आईवडिलांना शाळेत सोडण्यासाठी हट्ट करीत शाळेला जाण्यास नकार देत आहेत.

- शाळा सुरू झाल्या तरी अनेक स्कूलबस अद्याप सुरू नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थी स्कूलबस नसल्याचे सांगत आहेत.

- नववी-दहावीच्या अद्याप पूर्ण तासिका होत नाहीत, त्यामुळे ऑनलाइनच बरे असे सांगत काही विद्यार्थी टाळाटाळ करीत आहेत.

- आठवीच्या अनेक विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची इच्छा आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गर्दीमुळे ते शाळेचा कंटाळा करीत आहेत.

वर्ग सुरू करण्याची तयारी

शिक्षण विभागाने शहर व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत १ हजार ७८ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, ग्रामीण भागातील ७ हजार ४३६ शिक्षकांची चाचणी होणार आहे. शहरातील मनपा व खासगी व्यवस्थापनाच्या एकूण ४०५ शाळांमध्ये ग्रामीण भागातील १ हजार ९२३ शाळांमधील पाचवी चे आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत.

कोट-१

बाहेर कोरोना असल्याचे आईबाबांनीच सांगितले आहे. त्यांनी बाहेर खेळायलाही जाऊ दिले नाही. आता अजून स्कूलबसही सुरू झाली नाही. मग शाळेत कसे जायचे?

- संदेश जाधव, पाचवीतील विद्यार्थी

कोट-२

नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी अजून काही विद्यार्थी शाळेत येत नाहीत. तर पाचवी ते आठवीचे वर्ग कशासाठी सुरू केले जात आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा महत्त्वाच्या असल्याने हेच वर्ग सुरू करायला हवे होते.

- भूषण पाटील, सहावीतील विद्यार्थी

कोट-३

आता शाळा सुरू होत असल्याने किमान तीन महिने तरी अभ्यास चांगला होईल. त्याचा पुढच्या वर्षातही फायदा होईल. शाळेत शिक्षकांनी शिकविलेले ऑनलाइनपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल.

- तेजस अहिरे, सातवीतील विद्यार्थी

कोट-४

नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे आता आठवीचे वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. तसेच स्कूलबसही सुरू होणे आवश्यक आहे. मागील उणीव भरून काढण्यासाठी प्रत्यक्ष वर्गांसोबत ऑनलाइन अभ्यासक्रही सुरूच राहायला हवा

- गौरव टिळे, आठवीतील विद्यार्थी