शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदींच्या सभेत सुरक्षाव्यवस्थेचा अतिरेक; काळे कपडे, बाटल्या, कंगव्यांनाही बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:05 IST

कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या असलेल्या नाराजीतून आंदोलन होण्याची शक्यता, मैदानावर साप निघण्याची भीती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्थेविषयी काळजीतून सोमवारच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेत सुरक्षाव्यवस्थेने अतिरेक केला.

नाशिक : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या असलेल्या नाराजीतून आंदोलन होण्याची शक्यता, मैदानावर साप निघण्याची भीती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्थेविषयी काळजीतून सोमवारच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेत सुरक्षाव्यवस्थेने अतिरेक केला. डोक्यावर कडक उन्हाचा मारा झेलत मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्यांना तब्बल दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागली तर पाण्याच्या बाटल्या, महिलांची पर्स, पिशव्यांना बंदी घालण्यात आल्याने अनेकांना पाण्यावाचून शिक्षा करण्यात आली. काळे कपडे, टोप्यांना मज्जाव करून श्रोत्यांच्या खिशातील कंगवा, तंबाखू, चुन्याची डबी, बडीशोपच्या पुड्याही सुरक्षा दलाने बाहेर फेकून दिल्या. सुरक्षाव्यवस्थेच्या या अतिरेकाने श्रोत्यांना सभा सुरू होण्यापूर्वी व आटोपल्यानंतरही प्रचंड मनस्ताप भोगावा लागला.युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर जागेचा शोध सुरू झाला. जोपूळ रस्त्यावर बाजार समितीच्या मोकळ्या जागेवर सभास्थळ निवडण्यात आले. परंतु याठिंकाणी मोठ्या प्रमाणावर गवत असल्यामुळे साप, नागांचा वावर आयोजकांसाठी डोकेदुखी ठरला. त्यातून मग सर्पमित्र, वनरक्षक तैनात करण्यात आले, तर शेतकरी आंदोलनाची भीती असल्याने शेतकऱ्यांना नोटिसा देऊन त्यांचा आवाज गप्प करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. सभास्थळी येणाºया प्रत्येक व्यक्तीची तीन ते चार ठिकाणी कसून तपासणी करून सर्व प्रकारच्या वस्तूंना बंदी लादण्यात आली. पेनची तपासणी, मोबाइलची पाहणी, हेल्मेट, कंबरेचा बेल्ट तपासून पाहण्यात आले. महिला, तरुणीदेखील या जाचक तपासणीतून सुटल्या नाहीत. त्यांच्या पर्सदेखील काढून घेण्यात आल्या.श्रोत्यांना मसाले भाताची मेजवानीसभेसाठी धुळे, मालेगाव, कळवण, पेठ, सुरगाणा, चांदवड, नाशिक आदी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गाड्या भरून कार्यकर्त्यांना आणण्यात आले. सकाळी ७ वाजेपासून घर सोडलेल्या कार्यकर्त्यांना सभा आटोपल्यानंतर वाहनपार्किंगच्या ठिकाणी मसाले भात, थंड पाण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली. ते घेण्यासाठी झुंबड उडाली, परंतु खाण्यासाठी कोणताही आडोसा नसल्याने काहींनी तप्त जमिनीवरच ठाण मांडून मसाले भातावर ताव मारला.वाहनांची गर्दी होणार असल्याने जोपूळ रस्त्यावर सहा ते सात ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सभास्थळ गाठण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागली. मात्र सभा सुटल्यानंतर अनेकांना आपले वाहनच सापडत नसल्याने अनेकांची धावपळ उडाली.जामर लावल्यामुळे भ्रमणध्वनीला रेंज मिळत नसल्याचा फटका सभेसाठी आलेल्या सर्वांनाच बसला. सभा संपल्यानंतरही सुमारे अर्धा ते पाऊण तास भ्रमणध्वनी हॅँग होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीnashik-pcनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा