शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मोदींनी वांगेसटची केली कांदेसट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:13 IST

नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात,

नाशिक : नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात, असे सांगितल्याने जाणकारांना धक्का बसला. चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याच्या भरताचे आपल्याकडे महत्त्व आहे. चातुर्मासानंतर या दिवशी वांग्याबरोबरच कांदे आहारात सुरू केले जात असले तरी दिवसभर कांदे खाण्याचा मात्र तो दिवस नसतो. त्यामुळे मोदी यांच्या नव्या संस्कृती शोधाने तो चर्चेचा विषय ठरला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिक जिल्ह्णातील पिंपळगाव येथे होणार असल्याने शेतकऱ्यांच्या कांदा आंदोलनाचा त्यांनी आधीच धसका घेतला होता. त्यामुळे आंदोलने कशी टाळता येतील यावर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने विशेष काळजी घेतली आणि काटेकोर तपासणीत कोणी डोक्यावर ऊन ओकत असल्याने ऊन लागू नये म्हणून जवळ कांदा ठेवावा तर तेही नाकारण्यात आले होते. परंतु अपेक्षेप्रमाणे मोदी यांनी सभेत कांद्याचा विषय काढलाच. कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने निर्यात शुल्क कमी केले तसेच कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन शुल्क लागू केले अशाप्रकारची माहिती देतानाच ते संस्कृतीवर घसरले.चंपाषष्ठी म्हणजे खंडेरावाच्या नवरात्राचा अखेरचा दिवस या दिवशी वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवला जातो, तर चातुर्मासात कांदे- लसूण खाणे वर्ज्य असल्याने त्या आधी म्हणजे कांदे नवमीला कांद्याचे पदार्थ तयार केले जातात. तथापि, दिवसभर कांदे खाण्याची मात्र कोणतीही परंपरा नाही, असे जाणकार म्हणतात. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी म्हणजे नवमीला कांदे नवमी म्हणतात. त्या दिवसानंतर कांदा वर्ज्य असतो. तो चंपाषष्ठीलाच सुरू करतात. अनेक जण चंपाषष्ठीला वांगेसट म्हणतात. परंतु मोदी यांनी या दिवसाचे मात्र कांदेसटात रूपांतर केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.परंपरेचे रसभरीत वर्णनआपल्याकडे वर्षातील एक दिवस असतो. त्या दिवशी दिवसभर कांदे खात असतात. त्याला चंपाषष्ठी म्हणतात असे सांगून मोदी यांनी या परंपरेचे रसभरीत वर्णन केले. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा म्हणून किती चांगली परंपरा सुरू केली. त्यात किती समाजहिताचा व्यापक विचार होता असे सांगून त्यांनी संस्कृतीचे गुणगान केले, परंतु त्यामुळे अनेकांना धक्का बसला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीnashik-pcनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीonionकांदा