शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मोदी सरकार राज्यघटना बदलण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:44 IST

देशवासीयांना कॉँग्रेसने राज्य घटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्याच हक्कात मोदी सरकार हस्तक्षेप करीत आहेत. आरक्षणाचा फेरविचार करण्याचे आवाहन वारंवार राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत आहे.

ठळक मुद्देराज्यघटना वाचविण्यासाठी संघर्ष करण्याची गरज संविधान दिनानिमित्त मेळावा देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप

नाशिक : देशवासीयांना कॉँग्रेसने राज्य घटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्याच हक्कात मोदी सरकार हस्तक्षेप करीत आहेत. आरक्षणाचा फेरविचार करण्याचे आवाहन वारंवार राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत आहे. शिवाय विविध कायदे बदलून देशातील सर्वोत्तम घटनाच बदलण्याचा घाट सरकार करीत आहे. अशावेळी राज्यघटना वाचविण्यासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत कॉँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी व्यक्त केले.नाशिक शहर जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने येथील हॉटेल पंचममध्ये संविधान दिनानिमित्त मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. विदेशी नेत्यांच्या तालावर चालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर कॉँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, भाई नगराळे, डी. जी. पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. शोेभा बच्छाव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  काल-परवा उदयास आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात गेली साठ वर्षे सत्ता असलेल्या कॉँग्रेसने काय केले, असा वारंवार प्रश्न करतात. मात्र देशाला घटना देणाºया कॉँग्रेसने सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य घटना दिली आणि बॅँकेच्या राष्टÑीयीकरणापासून पंचायत राज व्यवस्थेपर्यंत तसेच यूपीए सरकारनेही रोजगार, शिक्षणाचा हक्क दिला. परंतु हेच अधिकार आता मोदी हटविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करून मोहनप्रकाश यांनी देशातील नागरिकांनी शाकाहार करावा हेदेखील आता सरकार ठरवित आहे. धर्मनिरपेक्षता, जाती निर्मूलन या सर्वच चौकटींना मोडले जात आहे. आरक्षणाची समीक्षा करा, असे वारंवार सांगितले जात आहे.  तर अगदी ग्रामपंचायतीसाठीदेखील शिक्षणाची अट टाकून राजकीय हक्क डावलले जात आहेत, असेही ते म्हणाले. नोटाबंदी, जीएसटी हे निर्णय विदेशी नेत्यांच्या सूचनेनुसार घेतले जात आहेत. अशाप्रकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली असून, सर्व बॅँका एनपीएत गेल्या आहेत, असेही ते म्हणाले.  यावेळी शरद रणपिसे, विनायक देशमुख, भाई नगराळे आणि आमदार निर्मला गावित यांनी मनोगतात केंद्रातील भाजपा सरकारच्या कामकाजावर टीका केली. स्वागत शहराध्यक्ष शरद अहेर यांनी करताना शहर कॉँग्रेसच्या कामाचा आढावा घेतला.  प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सरकारच्या विरोधात चले जाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.  यावेळी व्यासपीठावर शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. ममता पाटील, राहुल दिवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.  आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर कधीही तिरंगा फडकवला जात नव्हता आणि देशात लालकिल्ला किंवा अन्यत्र तिरंगा फडकविण्याची भाषा केली जात होती. सेवादलाचे आंदोलन आणि न्यायालयाच्या आदेशानुसार संघ कार्यालयावर तिरंगा फडकावा लागला. जे कार्यालयावर तिरंगा फडकवीत नव्हते आणि ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले नाही, शिवाय गांधी हत्येनंतर मिठाई वाटली, असे संघाचे लोक आज राष्टÑवादाचे अजब धडे देत असल्याची टीका मोहनप्रकाश यांनी केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नोटबंदी केली आणि दुसºयाच दिवशी जपानच्या पंतप्रधानांना भेटले. त्यानंतर जीएसटी लागू करताना देशाला जणू स्वातंत्र्य मिळाले, असा उत्सव करण्यात आला आणि दुसºयाच दिवशी मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना आलिंगन देऊन भेटले. पूर्वी विदेशातील नेत्यांना हस्तांदोलन केले जात. आता मोदी यांनी झप्पी देण्याची नवी प्रथा आणली आहे. मोदी यांची ही झप्पी देशवासीयांना मात्र त्रासदायक ठरते आहे. कारण विदेशी नेत्यांच्या सांगण्यावरून नोटाबंदी आणि जीएसटीचे निर्णय घेतले गेले, असा आरोप मोहनप्रकाश यांनी केला.

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपा