शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

मनसेचे पुनश्च हरिओम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 02:02 IST

नाशिक महापालिका निवडणुकीतील सणसणीत पराभवानंतर कोपगृहात जाऊन बसलेल्या राज ठाकरे यांनी अखेर ‘राजगडा’ला सावरायची सुरुवात केली असून, अलीकडच्या त्यांच्या नाशिक दौºयाकडे त्याचदृष्टीने पाहता यावे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्याचे कसब राज यांच्या ठायी असल्याने या सावरासावरमधून पेटलेले कार्यकर्ते यापुढील काळात आक्रमकतेने विरोधकाची भूमिका बजावताना दिसून येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपक्ष पातळीवर फारशी सळसळ नव्हतीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यशैली खळ्ळखट्याकचीभाजपा विरोधकांमध्ये भर पडण्याचीच चिन्हे

नाशिक महापालिका निवडणुकीतील सणसणीत पराभवानंतर कोपगृहात जाऊन बसलेल्या राज ठाकरे यांनी अखेर ‘राजगडा’ला सावरायची सुरुवात केली असून, अलीकडच्या त्यांच्या नाशिक दौºयाकडे त्याचदृष्टीने पाहता यावे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्याचे कसब राज यांच्या ठायी असल्याने या सावरासावरमधून पेटलेले कार्यकर्ते यापुढील काळात आक्रमकतेने विरोधकाची भूमिका बजावताना दिसून येण्याची शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील मनसेच्या पराभवाने राज ठाकरे यांनी नाशिककडे काहीसे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत होते. मध्यंतरी खासगी कार्यक्रमानिमित्त त्यांचे दौरे झालेही, परंतु पक्ष संघटनात्मक पातळीवर फारशी सळसळ दिसून येऊ शकली नव्हती. अलीकडेच झालेल्या दौºयात मात्र त्यांनी निस्तेज झालेल्या संघटनेला सावरण्याचा व आपल्या खास शैलीने ‘टॉनिक’ देण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. जनतेची गाºहाणी मांडत व्यवस्थेच्या नावाने रडणारे कार्यकर्ते आपल्याला आवडत नाहीत, असे सांगत तक्रारी घेऊन येण्यापेक्षा तुमच्या तक्रारी माझ्यापर्यंत येतील असे काही करून दाखवा, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना चेतविण्याचा प्रयत्न केला. तसेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यशैली खळ्ळखट्याकची राहिली आहे. त्यामुळे आता मार खाणारे नव्हे, देणारे कार्यकर्ते हवेत; या राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार यापुढील काळात काय पहावयास मिळते याची उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे. अर्थातच, येथे व्यवस्थेतील चालढकलच्या अनुषंगाने राज यांनी सदरचे आवाहन केले आहे. ते तसे लक्षात न घेता मनसैनिकांकडून उगाचच कोणालाही मार देण्याचे प्रकार घडून आले तर त्यातून नवीनच संकटाला सामोरे जाण्याची वेळ येईल हा भाग वेगळा. राजकारणात लाटा येत असतात. कधीकधी निराशाही पदरी येते. पण त्यामुळे हबकून न जाता नव्या दमाने उठून उभे राहायचे असते. राज यांनी तोच मंत्र आपल्या कार्यकर्त्यांना दिला. ज्या नाशिक महापालिकेत राज यांची सत्ता होती तेथे आता भाजपाचे कारभारी आहेत. केंद्र व राज्यातील भाजपाच्या सत्ता कारभाराचे वाभाडे काढीत ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाही लक्ष केल्याचे दिसून आले आहे. मोदी भक्तांची संभावना ‘नमोरुग्ण’ म्हणून करत नाशिक महापालिकेतील कारभाराविरोधात मनसैनिकांना लढण्याचा व भोंगळ कारभारावर तुटून पडण्याचा आदेश ते देऊन गेल्याने यापुढील काळात स्थानिक भाजपा नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येऊ नये. दुसरे म्हणजे, भाजपात संधी असल्याचे पाहून महापालिका निवडणुकीत अनेकजण तिकडे चालते झाले होते. अशांपैकी जे पुन्हा मनसेत परत येऊ इच्छित आहेत त्यांना पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल, असे बजावले गेल्याने अडचणीच्या काळात पक्षात टिकून राहिलेल्यांचा हुरूप वाढण्यास मदत झाली आहे. राज यांच्या या दौºयात समृद्धीबाधितांनीही त्यांची भेट घेतली. या द्रुतगती मार्गामुळे जमिनी जाणाºया शेतकºयांना स्थानिक पातळीवर स्वत: संघटित होण्याचा सल्ला त्यांनी दिल्याने संबंधितांनी निराशेचा सूर आळवला, परंतु एकीकडे अन्य शेतकरी शासनाशी व्यवहार करीत असताना मोजक्या प्रमाणात राहिलेल्यांमध्ये एकजूट नसल्याने राज यांचा सल्ला गैर ठरविता येणारा नाही. या समृद्धीबाधितांचे नेतृत्त्व डाव्या चळवळीतील राजू देसले करीत आहेत. जिल्ह्यातील अन्य अनेक प्रश्नांसंदर्भात ते आपल्या पक्षाच्या वतीने नेहमी मोर्चेबाजी करीत असतात. परंतु ‘समृद्धी’प्रश्नी आपल्या पक्षाच्या मर्यादा लक्षात घेता ते शरद पवार, उद्धव ठाकरे ते राज ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवताना दिसून येतात. यात राज यांनी त्यांना स्पष्टपणे सुनावल्याचे दिसून आले. ते राज यांच्या स्वभावाला साजेसे होते. एकूणच राज यांनी पुन्हा नव्याने चालविलेली तयारी पाहता भाजपा विरोधकांमध्ये भर पडण्याचीच चिन्हे आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेcommunityसमाज