शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

मनपाच्या पाणी आरक्षणात १०० दलघफू वाढ शक्य

By admin | Updated: July 7, 2016 00:31 IST

आठ दिवसांची तूट : १७ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा गंगापूर धरणात शिल्लक

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात महापालिकेच्या एकूण ३००० दलघफू आरक्षित पाणीसाठ्यापैकी केवळ १७४ दलघफू म्हणजे १७ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असून ३१ जुलैपर्यंत आठ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी मनपाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अतिरिक्त सुमारे १०० दलघफू पाण्याची मागणी नोंदवावी लागणार आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या वादानंतर शासनाने सन २०१५-१६ या वर्षासाठी महापालिकेला गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित निश्चित केले होते. त्यानंतर पुन्हा त्यात बदल करत शासनाने गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणी वाढवून दिल्याने आरक्षित पाणी ३००० दलघफूवर जाऊन पोहोचले. त्यापैकी गंगापूर धरणातून महापालिकेने आतापर्यंत २८२५ दलघफू पाण्याची उचल केली असून दारणातून केवळ १६६ दलघफू पाण्याचा उपसा झालेला आहे. त्यामुळे गंगापूरमध्ये दि. ६ जुलैअखेर १७४ दलघफू आरक्षित पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिका प्रतिदिन १० दलघफू पाणी उचलत आहे. त्यामुळे आरक्षित पाणीसाठा हा केवळ १७ दिवस पुरणार आहे. साधारणपणे २३ जुलैच्या आसपास गंगापूरमधील महापालिकेचे पाण्याचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी म्हणजे शिल्लक आठ दिवसांसाठी महापालिकेला सुमारे ८० ते १०० दलघफू पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे वाढीव पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे. ३१ जुलैनंतर नव्याने आरक्षित पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे. त्यामुळे आठ दिवसांच्या पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याचना करावी लागणार असून, गंगापूर धरणातील वाढत चाललेला पाणीसाठा पाहता शासनाला सदर मागणी पूर्ण करणे भाग पडणार आहे. दारणा धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असली तरी चेहेडी बंधाऱ्यात पाणी सोडल्याशिवाय मनपाला पाण्याचा उपसा करता येणार नाही. त्यामुळे गंगापूरमधूनच वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)