शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मनपाच्या पाणी आरक्षणात १०० दलघफू वाढ शक्य

By admin | Updated: July 7, 2016 00:31 IST

आठ दिवसांची तूट : १७ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा गंगापूर धरणात शिल्लक

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात महापालिकेच्या एकूण ३००० दलघफू आरक्षित पाणीसाठ्यापैकी केवळ १७४ दलघफू म्हणजे १७ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असून ३१ जुलैपर्यंत आठ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी मनपाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अतिरिक्त सुमारे १०० दलघफू पाण्याची मागणी नोंदवावी लागणार आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या वादानंतर शासनाने सन २०१५-१६ या वर्षासाठी महापालिकेला गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित निश्चित केले होते. त्यानंतर पुन्हा त्यात बदल करत शासनाने गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणी वाढवून दिल्याने आरक्षित पाणी ३००० दलघफूवर जाऊन पोहोचले. त्यापैकी गंगापूर धरणातून महापालिकेने आतापर्यंत २८२५ दलघफू पाण्याची उचल केली असून दारणातून केवळ १६६ दलघफू पाण्याचा उपसा झालेला आहे. त्यामुळे गंगापूरमध्ये दि. ६ जुलैअखेर १७४ दलघफू आरक्षित पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिका प्रतिदिन १० दलघफू पाणी उचलत आहे. त्यामुळे आरक्षित पाणीसाठा हा केवळ १७ दिवस पुरणार आहे. साधारणपणे २३ जुलैच्या आसपास गंगापूरमधील महापालिकेचे पाण्याचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी म्हणजे शिल्लक आठ दिवसांसाठी महापालिकेला सुमारे ८० ते १०० दलघफू पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे वाढीव पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे. ३१ जुलैनंतर नव्याने आरक्षित पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे. त्यामुळे आठ दिवसांच्या पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याचना करावी लागणार असून, गंगापूर धरणातील वाढत चाललेला पाणीसाठा पाहता शासनाला सदर मागणी पूर्ण करणे भाग पडणार आहे. दारणा धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असली तरी चेहेडी बंधाऱ्यात पाणी सोडल्याशिवाय मनपाला पाण्याचा उपसा करता येणार नाही. त्यामुळे गंगापूरमधूनच वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)