शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

भेसळीबाबतच्या शासकीय अनास्थेवरून आमदार सत्यजित तांबे आक्रमक

By suyog.joshi | Updated: October 11, 2023 10:41 IST

केवळ तीनच टीपीसी यंत्रे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धडक मोहीम राबवण्याची गरज

नाशिक (सुयोग जोशी) : दिवाळीला फक्त एक महिना उरला असताना आता सगळीकडे फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत भेसळयुक्त तेल, तसेच तळल्या जाणाऱ्या तेलाचा सातत्याने होणारा वापर, याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नाशिक विभागात केवळ तीनच टीपीसी यंत्र कशी, ती कधी वाढविणार, असा प्रश्न आमदारसत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक ‘लोकमत’मध्ये दि. ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘वारंवार तळले जाणारे खाद्यतेल ओळखणार तरी कसे’ या बातमीची गंभीर दखल तांबे यांनी घेतली आहे. त्या बातमीचा आधार देत तांबे यांनी अन्न व औषध प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. वारंवार तळले जाणाऱ्या तेलातील भेसळ ओळखण्यासाठी टीपीसी नावाचं यंत्र वापरलं जातं. पाच जिल्ह्यांमध्ये मिळून अशी फक्त तीनच यंत्रे आहेत. या परिस्थितीकडेही तांबे यांनी लक्ष वेधलं आहे.

सणासुदीचा काळ आला की, दूध, मावा यांच्यासोबतच तेलात भेसळ होण्याचे प्रमाण वाढते. तेलातील भेसळीचं प्रमाण तपासण्यासाठी टोटल पोलर काऊंट म्हणजे टीपीसी नावाचं यंत्र वापरलं जातं. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून फक्त तीनच यंत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे तेलातील भेसळ ओळखणार कशी, असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला.

धडक मोहीम राबविण्याची गरज

भेसळयुक्त तेलात तयार झालेल्या खाद्यपदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी संभवतात. यात घसा खवखवण्यापासून थायरॉइड, सर्दी-खोकला आणि कोलेस्ट्रॉल वाढून हृदयरोगाच्या समस्या अशा अनेक तक्रारींचा समावेश आहे. याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने खास दिवाळी आधी धडक मोहिमा राबवण्याची गरज तांबे यांनी बोलून दाखवली. तसंच प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन यंत्रे तरी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही तांबे यांनी केली आहे.अधिकारीच करतात लिपिकाची कामं

अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागात एकूण १९ पदं मंजूर आहेत. मात्र, सध्या फक्त सहा अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने लिपिकांची कामंही अधिकाऱ्यांना करावी लागत आहेत. त्याशिवाय संपूर्ण नाशिक विभागात मिळून फक्त एक वाहन उपलब्ध असल्याने अधिकारी वर्गाचीही अडचण होत असल्याचं समोर येत आहे. कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्याची गरज असल्याचे तांबे यांनी सांगितले.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसMLAआमदार