शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:28 IST

नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले.

ओझर : नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले.  यावेळी आमदार कदम यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना पक्षाची भूमिका हीच माझी असल्याने गेल्या विधिमंडळ अधिवेशनात मराठा समाजाचा अंत बघू नका अन्यथा उद्रेक होईल असा इशारायापूर्वीच आपण सरकारला दिला होता, याचाच प्रत्यय आता येत  आहे.  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे हीच शिवसेना पक्षाची भूमिका असून, या अधिवेशनात मराठा समाजाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडू, अशी ग्वाही कदम यांनी सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनप्रसंगी दिली.मराठा समाजाच्या वतीने कदम यांच्या संपर्ककार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक तथा छावाचे जिल्हाध्यक्ष करण गायकर, पंचायत समिती सभापती राजेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक गणेश कदम, राजेंद्र देसले, तुषार जगताप, उमेश शिंदे, माधवी पाटील, शिवाजी मोरे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते. करण गायकर यांनी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानत राज्य सरकारने तातडीने मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. जिल्हा समन्वयक उमेश देशमुख यांनी मराठा समाजाची विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे बाजू मांडावी अशी मागणी केली.तुषार जगताप यांनी सरकार फसव्या घोषणा करीत असल्याची टिका केली. शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड यांनी शिवसेना सकल मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी वसंत गवळी, सतीश नवले, गणेश कदम यांनी सकल मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली.  यावेळी सुभाष होळकर, केशवराव बोरस्ते, बाळासाहेब बोरस्ते, अशोक निफाडे, दशरथ रूमणे, उपसरपंच सागर शेजवळ, पं. स. सदस्य पंडितराव आहेर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश महाले, संजय पगार, सतीश नवले, प्रशांत पगार, नितीन काळे, विशाल मालसाने, अमित कोळपकर, सतीश पगार, विक्रम शेजवळ आदी उपस्थित होते.आंदोलनात राजकारण आणू नये : कदमकदम यांनी मराठा बांधवांच्या भावनांना हात घालत ज्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. स्थगन प्रस्तावाबाबत विरोधकांचीच मोठी कोंडी झाल्याचे कदम यांनी सांगितले. या आंदोलनात कोणीही राजकारण आणू नये. समाजासाठी सर्वात पहिली भूमिका मीच मांडून आताच्या परिस्थितीची जाणीवदेखील करून दिली होती. ओझर येथील मोठा बंदोबस्त तैनात होता; परंतु शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन पार पडले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMLAआमदार