शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:28 IST

नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले.

ओझर : नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले.  यावेळी आमदार कदम यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना पक्षाची भूमिका हीच माझी असल्याने गेल्या विधिमंडळ अधिवेशनात मराठा समाजाचा अंत बघू नका अन्यथा उद्रेक होईल असा इशारायापूर्वीच आपण सरकारला दिला होता, याचाच प्रत्यय आता येत  आहे.  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे हीच शिवसेना पक्षाची भूमिका असून, या अधिवेशनात मराठा समाजाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडू, अशी ग्वाही कदम यांनी सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनप्रसंगी दिली.मराठा समाजाच्या वतीने कदम यांच्या संपर्ककार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक तथा छावाचे जिल्हाध्यक्ष करण गायकर, पंचायत समिती सभापती राजेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक गणेश कदम, राजेंद्र देसले, तुषार जगताप, उमेश शिंदे, माधवी पाटील, शिवाजी मोरे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते. करण गायकर यांनी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानत राज्य सरकारने तातडीने मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. जिल्हा समन्वयक उमेश देशमुख यांनी मराठा समाजाची विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे बाजू मांडावी अशी मागणी केली.तुषार जगताप यांनी सरकार फसव्या घोषणा करीत असल्याची टिका केली. शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड यांनी शिवसेना सकल मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी वसंत गवळी, सतीश नवले, गणेश कदम यांनी सकल मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली.  यावेळी सुभाष होळकर, केशवराव बोरस्ते, बाळासाहेब बोरस्ते, अशोक निफाडे, दशरथ रूमणे, उपसरपंच सागर शेजवळ, पं. स. सदस्य पंडितराव आहेर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश महाले, संजय पगार, सतीश नवले, प्रशांत पगार, नितीन काळे, विशाल मालसाने, अमित कोळपकर, सतीश पगार, विक्रम शेजवळ आदी उपस्थित होते.आंदोलनात राजकारण आणू नये : कदमकदम यांनी मराठा बांधवांच्या भावनांना हात घालत ज्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. स्थगन प्रस्तावाबाबत विरोधकांचीच मोठी कोंडी झाल्याचे कदम यांनी सांगितले. या आंदोलनात कोणीही राजकारण आणू नये. समाजासाठी सर्वात पहिली भूमिका मीच मांडून आताच्या परिस्थितीची जाणीवदेखील करून दिली होती. ओझर येथील मोठा बंदोबस्त तैनात होता; परंतु शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन पार पडले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMLAआमदार