शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

अल्पसंख्याकांना तंत्रशिक्षण योजना कागदावरच

By admin | Updated: June 7, 2014 00:33 IST

चार वर्षांत एकही संस्था सुरू करण्याची परवानगी शासनाने न दिल्याने अल्पसंख्याक समाजाने याबाबत नाराजी प्रकट केली आहे.

राजीव वडगे ल्ल संगमेश्वर, मालेगावअल्पसंख्याक समाजाला शास्त्रशुद्ध तांत्रिक शिक्षण देऊन जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात तंत्रनिकेतन व आय. टी. आय. सुरू करण्याची घोषणा करुनही गेल्या चार वर्षांत एकही संस्था सुरू करण्याची परवानगी शासनाने न दिल्याने अल्पसंख्याक समाजाने याबाबत नाराजी प्रकट केली आहे.सच्चर आयोगाने अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना सुचविल्या होत्या. अल्पसंख्याक समाजाला तंत्रशुद्ध तांत्रिक शिक्षण दिल्यास त्यांचे जीवनमान सुधारेल या अनुषंगाने २०१० साली महाराष्ट्र शासनाने राज्यात मालेगावसह भिवंडी व मुंबई येथे तंत्रनिकेतन व औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अकोला, वाशिम, भिवंडी आदिं सात ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार अल्पसंख्याक संस्थांकडून वृत्तपत्रात जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले. पाच एकर जागा, तीन वर्षांचे संस्था रजिस्ट्रेशन, तांत्रिक शिक्षण संस्था चालविण्याचा अनुभव आदि निकष लावण्यात आले होते. यानुसार मालेगाव परिसरातील सिटीझन वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी, खातून एज्युकेशन सोसायटी, ए.टी.टी., ए.आय.टी. आदि सात अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रनिकेतन सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिले होते. त्यानुसार खातून एज्युकेशन सोसायटी या निकषाला पात्र ठरली होती. केंद्र शासनाकडून तीन कोटी रुपयांचे अनुदानही महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रस्तावाकडे संपूर्णपणे डोळेझाक करून एकाही संस्थेला तंत्रनिकेतन सुरू करण्याची परवानगीच दिली नाही. दोन वेळा वृत्तपत्रातून जाहिरात देऊनही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची संपूर्ण फाईल पडून आहे. शासन फक्त घोषणाच करते, कार्यवाही करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशाच प्रकारची योजना फक्त कागदावरच राहते. प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी होत नसल्याचे एक किस्साही पुढे आला आहे. केंद्र शासनाने महिलांच्या प्रगतीसाठी ‘नई रोशनी’ नावाची एक योजना सुरू केली आहे. त्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन सर्व प्रकरण महाराष्ट्र शासनाकडे पाठविले असता राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगण्यात आल्याने अनेक संस्थाचालकांना याचा धक्काच बसला आहे.