शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याकांना तंत्रशिक्षण योजना कागदावरच

By admin | Updated: June 7, 2014 00:33 IST

चार वर्षांत एकही संस्था सुरू करण्याची परवानगी शासनाने न दिल्याने अल्पसंख्याक समाजाने याबाबत नाराजी प्रकट केली आहे.

राजीव वडगे ल्ल संगमेश्वर, मालेगावअल्पसंख्याक समाजाला शास्त्रशुद्ध तांत्रिक शिक्षण देऊन जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात तंत्रनिकेतन व आय. टी. आय. सुरू करण्याची घोषणा करुनही गेल्या चार वर्षांत एकही संस्था सुरू करण्याची परवानगी शासनाने न दिल्याने अल्पसंख्याक समाजाने याबाबत नाराजी प्रकट केली आहे.सच्चर आयोगाने अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना सुचविल्या होत्या. अल्पसंख्याक समाजाला तंत्रशुद्ध तांत्रिक शिक्षण दिल्यास त्यांचे जीवनमान सुधारेल या अनुषंगाने २०१० साली महाराष्ट्र शासनाने राज्यात मालेगावसह भिवंडी व मुंबई येथे तंत्रनिकेतन व औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अकोला, वाशिम, भिवंडी आदिं सात ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार अल्पसंख्याक संस्थांकडून वृत्तपत्रात जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले. पाच एकर जागा, तीन वर्षांचे संस्था रजिस्ट्रेशन, तांत्रिक शिक्षण संस्था चालविण्याचा अनुभव आदि निकष लावण्यात आले होते. यानुसार मालेगाव परिसरातील सिटीझन वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी, खातून एज्युकेशन सोसायटी, ए.टी.टी., ए.आय.टी. आदि सात अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रनिकेतन सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिले होते. त्यानुसार खातून एज्युकेशन सोसायटी या निकषाला पात्र ठरली होती. केंद्र शासनाकडून तीन कोटी रुपयांचे अनुदानही महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रस्तावाकडे संपूर्णपणे डोळेझाक करून एकाही संस्थेला तंत्रनिकेतन सुरू करण्याची परवानगीच दिली नाही. दोन वेळा वृत्तपत्रातून जाहिरात देऊनही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची संपूर्ण फाईल पडून आहे. शासन फक्त घोषणाच करते, कार्यवाही करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशाच प्रकारची योजना फक्त कागदावरच राहते. प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी होत नसल्याचे एक किस्साही पुढे आला आहे. केंद्र शासनाने महिलांच्या प्रगतीसाठी ‘नई रोशनी’ नावाची एक योजना सुरू केली आहे. त्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन सर्व प्रकरण महाराष्ट्र शासनाकडे पाठविले असता राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगण्यात आल्याने अनेक संस्थाचालकांना याचा धक्काच बसला आहे.