शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

आम्हीच ज्ञानी असल्याचा काही नेत्यांचा अर्विभाव; विखे पाटलांचा नाव न घेता पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 12:03 IST

काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात. त्यात काही विशेष नाही विरोधी पक्ष नेत्यांचे ते कामच असते मी पण विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं आहे.

नाशिक-  राज्यात पूर परिस्थिती गंभीर असतानाही सरकार चांगलं काम करीत आहे. मात्र काही जण आम्हीच ज्ञानी आहोत अशा अर्विभावात काम करत असतात असा टोला राज्याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आज नाशिकमध्ये लगावला. 

देशाचा स्वातंत्र्य दिन नाशिकमध्ये उत्साहात साजरा झाला. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

राज्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पुरामुळे नुकसान झाले आहे. शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे अशा वेळी सरकार चांगले काम करीत आहे असे सांगून काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात. त्यात काही विशेष नाही विरोधी पक्ष नेत्यांचे ते कामच असते मी पण विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं आहे असेही विखे पाटील म्हणाले. पालकमंत्री म्हणून कोणाला कोठे नियुक्त करावे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. नाशिक किंवा अहमदनगर अशा कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली तर आपण अवश्य पार पाडू असेही विखे पाटील म्हणाले 

बुधवारी शरद पवार यांनी कोल्हापूरात पूरग्रस्तांची पाहणी करताना राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. काही ठिकाणी ट्रक अडवले जात असल्याची माहिती आहे. शासनाने गरजू पूरग्रस्तांना ही मदत पोहचेल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. सरकारमधील लोकांना अशा परिस्थितीला तोंड देण्याचा अनुभव नाही. काही गावांना भेटी देऊन निघून गेल्यानं काम होतं नाही. राज्यकर्ते याठिकाणी असताना प्रशासनाची हालचाल तातडीने होते. लातूरला भूकंप झाला तर मी 15 दिवस तिथे होतो अशी आठवण शरद पवारांनी करुन दिली होती.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलfloodपूर