शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
6
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
7
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
8
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
10
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
11
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
12
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
13
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
14
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
15
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
16
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
17
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
18
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
19
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
20
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा

मिनी मंत्रालयात ‘चारचौघी’च लालदिव्याच्या धनी

By admin | Updated: January 17, 2017 23:00 IST

मिनी मंत्रालयात ‘चारचौघी’च लालदिव्याच्या धनी

गणेश धुरी : नाशिकमिनी मंत्रालयाच्या अर्थात जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकतीस वेळा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीत आतापर्यंत केवळ चौघा महिलांनाच जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. एकतीसपैकी चार वेळा महिलांना लालदिव्याचे ‘धनी’ होण्याची संधी लाभली आहे.  १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदेची स्थापना झाली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान कॉँग्रेसचे माजी खासदार भानुदान कवडे यांना मिळाला. त्यानंतर आजतागायत केवळ चार वेळा जिल्हा परिषदेच्या सर्वांत मोठ्या पदावर अर्थात अध्यक्ष पदावर महिलांना संधी लाभली आहे.  राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण ठेवल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच विराजमान होण्याचा मान २१ मार्च २००२ रोजी खेडगावच्या विद्या दत्तात्रय पाटील यांना मिळाला. १७ फेब्रुवारी २००५ पर्यंत त्यांनी अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर अनुसूचित जाती महिला पदासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षित झाल्यानंतर नगरसूलच्या मायावती भगीनाथ पगारे यांना ३ डिसेंबर २००९ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी लाभली. २० मार्च २०१२ पर्यंत मायावती पगारे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने माजी मंत्री अर्जुन पवार यांच्या थोरल्या स्नुषा जयश्री नितीन पवार यांनी २१ मार्च २०१२ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्या अडीच वर्षानंतर म्हणजेच २० सप्टेंबर २०१४ रोजी अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्या. मागील अडीच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झाल्याने सुरुवातीला अपक्ष म्हणून व नंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहयोगी सदस्य झालेल्या विजयश्री रत्नाकर चुंबळे यांना २१ सप्टेंबर २०१४ मध्ये अध्यक्षपदाची संधी लाभली. एकतीस अध्यक्षांपैकी चार महिलांना संधीजिल्हा परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत ३१ अध्यक्ष झाले असून, त्यातील केवळ चौघा महिलांनाच अध्यक्षपदी आरूढ होण्याचा मान लाभला आहे. अर्थात २००२ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण नसल्यानेच म्हणा अध्यक्षपदाचा मान मिळाला नसेल. मात्र यापुढील अडीच वर्र्षांच्या काळातही २१ मार्च २०१७ पासून जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने तब्बल दीड दशक जिल्हा परिषदेच्या सत्तेवर ‘महिलाराज’ असल्याचे चित्र पहावयास मिळेल.