शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
4
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
5
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
6
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
7
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
8
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
9
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
11
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
12
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
13
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
14
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
15
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
16
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
17
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
18
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
19
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
20
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले

गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 15:47 IST

साकोरा : नासिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण यावर्षी देखिल शंभरीकडे वाटचाल करतांना दिसत आहे. सध्यस्थितीत गिरणा धरणात मृतसाठा वगळता २० हजार ८द. ल. घ. फूट म्हणजे ९२.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहीती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देसाकोरा :९२.३३ टक्के पाणीसाठा ;शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत

साकोरा : नासिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण यावर्षी देखिल शंभरीकडे वाटचाल करतांना दिसत आहे. सध्यस्थितीत गिरणा धरणात मृतसाठा वगळता २० हजार ८द. ल. घ. फूट म्हणजे ९२.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहीती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.गतवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा गिरणा धरणाने नव्वदी पार केल्याने परिसरातील शेतकरी सुखावले आहेत. विशेष म्हणजे धरणाच्या वरील भागातून आवक मंदावली असली तरी साठयात हळूहळू वाढ होत आहे. तसेच जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील गेल्या आठवड्यापासून झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होत असून, परिणामी गिरणा धरणाची वाटचाल सलग दुसर्या वर्षी शंभरीकडे होतांना दिसून येत आहे.गेल्या वर्षी आॅगस्ट मिहन्याच्या सुरु वातीलाच गिरणा धरणात केवळ ७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. अतिवृष्टि नंतर ठेंगोडा, हरणबारी, चनकापूर ठेंगोडा बंधारा हे ओहरफ्लो झाल्याने धरणातून १ आॅगस्टपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी महिनाभरातच तब्बल ११ वर्षांनंतर गिरणा धरणात शंभर टक्के साठा झाला होता. त्यामुळे यंदा देखील पावसाळ्याच्या सुरु वातीला जुन २०२० मध्ये धरणात ३४ टक्के म्हणजे ६३००.९० दशलक्ष घनफूट साठा शिल्लक होता. त्यानंतर गेल्या तीन मिहन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे गिरणा धरणाच्या साठ्यात हळूहळू वाढ झाली असून, गिरणा धरणातील साठा नाशिक जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असतो मालेगाव सह गिरणा पट्यात चांगला पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरते यातील चनकापूर, हरणबारी केळझर नाग्या-साक्या माणिकपुंज धरण ओहरफ्लो झाली आहेत. सध्या गिरणा धरणात हरणबारी, केळझर ,ठेगोडा बंधारा व चनकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आराम मोसम आण िगिरणा नदीतून देखील धरणात पाण्याची आवक सुरू आहे सध्या पाण्याचा प्रवाह मंदावला असला तरी संथगतीने का असेना परंतु गिरणा धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे गिरणा धरणाची क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट असून त्यात मृतसाठा धरून म्हणजे ९२.३३ टक्के इतका साठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.त्यामुळे आता नासिक आणि जळगांव या दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांचा पिण्याच्या तसेच जलसिंचनाच्या पाण्याचा काही वर्ष तरी प्रश्न राहणार नाही.फक्त नांदगाव तालुक्यातील ५६ खेडी पाणी पुरवठा योजनेला दुरूस्तीची गरज असून तीला शासकीय मदतीचा पुरेपूर वापर झाल्यास १०० टक्के ही योजना कार्यान्वित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याच्या अफवासध्यास्थितीत गिरणा धरण ९२.३३ टक्के भरले असून ९६ टक्के भरल्यानंतरच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र गिरणा धरणातून पाणी विसर्ग करण्यात येत असल्याच्या व्हाट्सॅप, फेसबुकच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरविण्यात येत असून, गिरणा धरण ९६ टक्के भरल्यानंतरच गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.-एस. आर. पाटील,शाखा अभियंता,गिरणा धरण.(फोटो१३साकोरा,१)

टॅग्स :DamधरणWaterपाणी