शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:53 IST

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते.

ठळक मुद्देपहिल्या पंधरवड्यातच निम्मे पीक बाधित : शेतकऱ्यांनी फिरवला पाच एकरावर ट्रॅक्टर

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते. त्यामुळे ५० टक्के मक्याचे उत्पन्न घटले होते. त्याचा परिणाम मक्याच्या दरावर होऊन बाजारभाव २००० ते २२०० रु पयांपर्यंत वधारले होते. परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने स्थानिक उत्पादकांना याचा फायदा झाला नाही. मक्याचे दर निम्म्याने घसरले आहे. त्यावर शासनाची मलमपट्टी म्हणून मका पिकाची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. परंतु शासनाकडे पुरेसे बारदान, वजनकाटे, गुदामे उपलब्ध नसल्याने ही खरेदी कासव गतीने सुरू आहे.अशा परिस्थितीत शेतकºयांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कसमादे पट्ट्यात मागील पंधरवड्यात ७० ते ८०टक्के शेतकºयांनी मक्याची पेरणी केली आहे. देवळा, कळवण, सटाणा आदी तालुक्यात विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहणेर, भऊर आदी परिसरात सर्वत्र मका हे मुख्य खरीप पीक समजले जाते. प्रारंभीच मका रोपांवर लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. बहुतांश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी काही भागावर प्रादुर्भाव वाढला आहे. लष्करी अळीचा कायमचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही उत्पन्नाची शास्वती वाटत नसल्याने विठेवाडी येथील शेतकरी व माजी सरपंच नंदलाल निकम यांनी त्यांच्या चार एकरावरील मका पिकावर ट्रॅक्टर फिरवला. त्यांनी पाच एकर क्षेत्रात सीजेंटा ६६६८ जातीच्या वाणाचे बियाणे ४ जूनला टाकले होते. त्यासाठी १३ किलो बियाणे घेतले होते.त्यासाठी पेरणी, मशागत, मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक आदींकरिता सुमारे ४० हजार रु पये खर्च करूनही लष्करी अळी आटोक्यात येईल, याची खात्री नसल्यामुळे त्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. सदर घटना तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांना कळविली असून त्यांनी शेतकºयाच्या बांधावर येऊन पाहणी करावी व परिसरातील शेतकºयांना लष्करी अळीपासुन संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली आहे.देवळा तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरुवातीलाच मका पीक लष्करी अळीने बाधित झाले आहे. यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून सागंण्यासाठी शासकीय कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणेने पुढाकार घेऊन योग्य ती काळजी घ्यावी.- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी