शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:53 IST

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते.

ठळक मुद्देपहिल्या पंधरवड्यातच निम्मे पीक बाधित : शेतकऱ्यांनी फिरवला पाच एकरावर ट्रॅक्टर

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते. त्यामुळे ५० टक्के मक्याचे उत्पन्न घटले होते. त्याचा परिणाम मक्याच्या दरावर होऊन बाजारभाव २००० ते २२०० रु पयांपर्यंत वधारले होते. परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने स्थानिक उत्पादकांना याचा फायदा झाला नाही. मक्याचे दर निम्म्याने घसरले आहे. त्यावर शासनाची मलमपट्टी म्हणून मका पिकाची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. परंतु शासनाकडे पुरेसे बारदान, वजनकाटे, गुदामे उपलब्ध नसल्याने ही खरेदी कासव गतीने सुरू आहे.अशा परिस्थितीत शेतकºयांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कसमादे पट्ट्यात मागील पंधरवड्यात ७० ते ८०टक्के शेतकºयांनी मक्याची पेरणी केली आहे. देवळा, कळवण, सटाणा आदी तालुक्यात विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहणेर, भऊर आदी परिसरात सर्वत्र मका हे मुख्य खरीप पीक समजले जाते. प्रारंभीच मका रोपांवर लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. बहुतांश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी काही भागावर प्रादुर्भाव वाढला आहे. लष्करी अळीचा कायमचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही उत्पन्नाची शास्वती वाटत नसल्याने विठेवाडी येथील शेतकरी व माजी सरपंच नंदलाल निकम यांनी त्यांच्या चार एकरावरील मका पिकावर ट्रॅक्टर फिरवला. त्यांनी पाच एकर क्षेत्रात सीजेंटा ६६६८ जातीच्या वाणाचे बियाणे ४ जूनला टाकले होते. त्यासाठी १३ किलो बियाणे घेतले होते.त्यासाठी पेरणी, मशागत, मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक आदींकरिता सुमारे ४० हजार रु पये खर्च करूनही लष्करी अळी आटोक्यात येईल, याची खात्री नसल्यामुळे त्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. सदर घटना तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांना कळविली असून त्यांनी शेतकºयाच्या बांधावर येऊन पाहणी करावी व परिसरातील शेतकºयांना लष्करी अळीपासुन संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली आहे.देवळा तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरुवातीलाच मका पीक लष्करी अळीने बाधित झाले आहे. यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून सागंण्यासाठी शासकीय कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणेने पुढाकार घेऊन योग्य ती काळजी घ्यावी.- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी