शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:53 IST

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते.

ठळक मुद्देपहिल्या पंधरवड्यातच निम्मे पीक बाधित : शेतकऱ्यांनी फिरवला पाच एकरावर ट्रॅक्टर

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते. त्यामुळे ५० टक्के मक्याचे उत्पन्न घटले होते. त्याचा परिणाम मक्याच्या दरावर होऊन बाजारभाव २००० ते २२०० रु पयांपर्यंत वधारले होते. परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने स्थानिक उत्पादकांना याचा फायदा झाला नाही. मक्याचे दर निम्म्याने घसरले आहे. त्यावर शासनाची मलमपट्टी म्हणून मका पिकाची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. परंतु शासनाकडे पुरेसे बारदान, वजनकाटे, गुदामे उपलब्ध नसल्याने ही खरेदी कासव गतीने सुरू आहे.अशा परिस्थितीत शेतकºयांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कसमादे पट्ट्यात मागील पंधरवड्यात ७० ते ८०टक्के शेतकºयांनी मक्याची पेरणी केली आहे. देवळा, कळवण, सटाणा आदी तालुक्यात विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहणेर, भऊर आदी परिसरात सर्वत्र मका हे मुख्य खरीप पीक समजले जाते. प्रारंभीच मका रोपांवर लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. बहुतांश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी काही भागावर प्रादुर्भाव वाढला आहे. लष्करी अळीचा कायमचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही उत्पन्नाची शास्वती वाटत नसल्याने विठेवाडी येथील शेतकरी व माजी सरपंच नंदलाल निकम यांनी त्यांच्या चार एकरावरील मका पिकावर ट्रॅक्टर फिरवला. त्यांनी पाच एकर क्षेत्रात सीजेंटा ६६६८ जातीच्या वाणाचे बियाणे ४ जूनला टाकले होते. त्यासाठी १३ किलो बियाणे घेतले होते.त्यासाठी पेरणी, मशागत, मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक आदींकरिता सुमारे ४० हजार रु पये खर्च करूनही लष्करी अळी आटोक्यात येईल, याची खात्री नसल्यामुळे त्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. सदर घटना तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांना कळविली असून त्यांनी शेतकºयाच्या बांधावर येऊन पाहणी करावी व परिसरातील शेतकºयांना लष्करी अळीपासुन संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली आहे.देवळा तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरुवातीलाच मका पीक लष्करी अळीने बाधित झाले आहे. यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून सागंण्यासाठी शासकीय कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणेने पुढाकार घेऊन योग्य ती काळजी घ्यावी.- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी