शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

शहा विद्यालयात जलदिनी ‘पाणी बचती’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:10 IST

सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे, पाण्याचा स्रोत प्रदूषित होऊ न देणे, जगात गोड्या पाण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे. पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे ही काळाची गरज असल्याचे मुख्याध्यापक गडाख यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उपशिक्षक रमेश रौंदळ यांनी सामुदायिक प्रतिज्ञा दिली. जल है तो कल है, पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडे लावा, गोड पाणी जपून वाचवा, पर्यावरणाचे संवर्धन करा, पाणी हेच जीवन यासारखे संदेश फलक तयार करण्यात आले होते. मेधा शुक्ल, बरखा साळी यांनी थर्माकोल, पुठ्ठे, कागदापासून पाण्याचे थेंब, मातीचा आकर्षक रंगवलेला ज्ञान कुंभ बनवला. पाण्याचे प्रतीक असलेले ते थेंब विद्यार्थी व शिक्षकांनी ज्ञानरुपी कुंभात टाकले. प्रत्येक थेंबावर संदेश दिला होता. विद्यार्थी पाण्याचे थेंब बनले होते. पाणी वाचवा, जतन करा असा संदेश यातून देण्यात आला. याप्रसंगी नामदेव कानसकर, शमीरुल्ला जहागीरदार, शिवाजी घोटेकर, सलीम चौधरी, रमेश रौंदळ, बाळासाहेब कुमावत, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रवींद्र कोकटे, राजेंद्र गवळी, नारायण वाघ, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, विश्वनाथ ठोक, सुरेखा गरुळे, सचिन रानडे, नामदेव गुरुळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाWaterपाणी