शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शहा विद्यालयात जलदिनी ‘पाणी बचती’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:10 IST

सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे, पाण्याचा स्रोत प्रदूषित होऊ न देणे, जगात गोड्या पाण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे. पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे ही काळाची गरज असल्याचे मुख्याध्यापक गडाख यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उपशिक्षक रमेश रौंदळ यांनी सामुदायिक प्रतिज्ञा दिली. जल है तो कल है, पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडे लावा, गोड पाणी जपून वाचवा, पर्यावरणाचे संवर्धन करा, पाणी हेच जीवन यासारखे संदेश फलक तयार करण्यात आले होते. मेधा शुक्ल, बरखा साळी यांनी थर्माकोल, पुठ्ठे, कागदापासून पाण्याचे थेंब, मातीचा आकर्षक रंगवलेला ज्ञान कुंभ बनवला. पाण्याचे प्रतीक असलेले ते थेंब विद्यार्थी व शिक्षकांनी ज्ञानरुपी कुंभात टाकले. प्रत्येक थेंबावर संदेश दिला होता. विद्यार्थी पाण्याचे थेंब बनले होते. पाणी वाचवा, जतन करा असा संदेश यातून देण्यात आला. याप्रसंगी नामदेव कानसकर, शमीरुल्ला जहागीरदार, शिवाजी घोटेकर, सलीम चौधरी, रमेश रौंदळ, बाळासाहेब कुमावत, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रवींद्र कोकटे, राजेंद्र गवळी, नारायण वाघ, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, विश्वनाथ ठोक, सुरेखा गरुळे, सचिन रानडे, नामदेव गुरुळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाWaterपाणी