शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शहा विद्यालयात जलदिनी ‘पाणी बचती’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:10 IST

सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे, पाण्याचा स्रोत प्रदूषित होऊ न देणे, जगात गोड्या पाण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे. पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे ही काळाची गरज असल्याचे मुख्याध्यापक गडाख यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उपशिक्षक रमेश रौंदळ यांनी सामुदायिक प्रतिज्ञा दिली. जल है तो कल है, पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडे लावा, गोड पाणी जपून वाचवा, पर्यावरणाचे संवर्धन करा, पाणी हेच जीवन यासारखे संदेश फलक तयार करण्यात आले होते. मेधा शुक्ल, बरखा साळी यांनी थर्माकोल, पुठ्ठे, कागदापासून पाण्याचे थेंब, मातीचा आकर्षक रंगवलेला ज्ञान कुंभ बनवला. पाण्याचे प्रतीक असलेले ते थेंब विद्यार्थी व शिक्षकांनी ज्ञानरुपी कुंभात टाकले. प्रत्येक थेंबावर संदेश दिला होता. विद्यार्थी पाण्याचे थेंब बनले होते. पाणी वाचवा, जतन करा असा संदेश यातून देण्यात आला. याप्रसंगी नामदेव कानसकर, शमीरुल्ला जहागीरदार, शिवाजी घोटेकर, सलीम चौधरी, रमेश रौंदळ, बाळासाहेब कुमावत, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रवींद्र कोकटे, राजेंद्र गवळी, नारायण वाघ, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, विश्वनाथ ठोक, सुरेखा गरुळे, सचिन रानडे, नामदेव गुरुळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाWaterपाणी