शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

विवाह मंडपातून समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:04 IST

विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने हा विवाह चर्चेचा ठरला.

नाशिक : विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने हा विवाह चर्चेचा ठरला.  नवनाथपंथी सामाजिक बहुद्देशीय संस्था व कानडे-शिंदे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सचिव चेतन कानडे यांचा विवाह नुकताच शहरात पार पडला. त्यांचा हा विवाह चर्चेत आला तो केवळ समाजप्रबोधनाच्या संकल्पनेमुळे. या विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांचे टॉवेल-टोपी नव्हे, तर चक्क कापडी पिशवी आणि तुळस, अमृतवृक्ष कडुनिंबाची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्वागत कक्षाजवळ दोन्ही परिवारांच्या नावांचा स्वागत फलक नव्हे तर चक्क सुरक्षित वाहतूक व रस्ता सुरक्षेविषयीचे प्रबोधन करणारा ‘स्टॅन्डी’ पाहुण्यांच्या नजरेस पडत होता. तसेच ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’, ‘वृक्ष संवर्धन, काळाची गरज’, ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे प्रबोधनात्मक वाक्य लिहिलेल्या सचित्र फलकांनी आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.  प्लॅस्टिक वापराचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम दाखविणाºया फलकासोबत अनेकांनी ‘सेल्फी’ही घेतली.  लग्नपत्रिका घरोघरी जाऊन वाटपाची प्रथाही या कुटुंबाने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास सकारात्मक बदल घडून येतो; मात्र त्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची. या कुटुंबाने पारंपरिक विवाह सोहळ्यात अशाच प्रकारे बदल घडवत समाजप्रबोधनावर भर दिला. विवाहाच्या आमंत्रणपत्रिकेच्या माध्यमातून नव्हे तर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत ‘स्मार्ट’ पद्धतीने दिले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांद्वारे तसेच भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत अगत्याचे निमंत्रण आपल्या मित्र-परिवाराला दिले.‘अक्षता’  फेकू नका...विवाह सोहळ्यात ‘अक्षता फेकू नका, तर त्या अक्षता दानपात्रात टाका’ अक्षतेच्या रूपाने वाया जाणाºया धान्याच्या माध्यमातून गोरगरिबांचे एकवेळचे जेवण सहज होऊ शकते, असा सामाजिक संदेशही त्यांनी यावेळी मंडपातून दिला. या विवाह सोहळ्यात अक्षता ऐवजी वधू-वरांवर आलेल्या वºहाडी मंडळींनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक