शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘मी-टू’ चळवळीविरुद्ध जोक करणाऱ्यांची दया येते -अनिता दाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 14:07 IST

‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक.

ठळक मुद्दे ‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक.

नाशिक : महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत देशभर विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘मी-टू’ चळवळीअंतर्गत व्यक्त व्हायला सुरुवात केलेली आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून त्याविषयी भरभरून वाचायला मिळत आहे. याचवेळी दुर्दैवाने ‘मी-टू’ चळवळीची खिल्ली उडवणारे जोक, संदेश यांनाही पूर आला आहे. असे जोक लाइक करणाऱ्या, फॉरवर्ड करणाºयांची दया येत असल्याची भावना अभिनेत्री अनिता दाते हिने व्यक्त केली. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता याविषयासह इतर अनेक पैलूंवर तिने प्रकाश टाकतानाच स्त्रियांना कणखर होण्याचे आवाहनही केले. त्यांच्याशी साधलेला हा संवादप्रश्न : तुला ‘मी-टू’ चळवळीबद्दल काय वाटते?उत्तर: ही चळवळ अत्यंत गरजेची आहे. अन्याय होत असेल, शारीरिक, मानसिक त्रास होत असेल तर महिलांनी, मुलींनी बोलले पाहिजे. तत्काळ त्याला वाचा फोडली पाहिजे. आपल्याला असणाºया कायदेशीर कवचाची मदत घेतली पाहिजे. ‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक असून, असे जोक फॉरवर्ड आणि लाइक करणाºयांचीही दया येते. अशा काही चळवळींची खर तर गरज आहे. त्यातले गांभीर्य समजून घेतले पाहिजे.प्रश्न : इतक्या वर्षांनंतर प्रकरण बाहेर येत असतील तर त्याचे काय होऊ शकते?उत्तर: त्या त्या प्रकरणांच्या बाबतीत खरं, खोटं आपण नाही सांगू शकत. पण त्या त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी पुढे आले पाहिजे, मदत केली पाहिजे. न्यायाच्या, सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. या प्रकरणांचे पुढे काय होईल, याबाबत लगेच काहीच स्पष्ट सांगता येणार नाही. पण अत्याचार करणारा माणूस लहान असो वा मोठा असो, तो दोषी आहे. त्याकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे. तो किती मोठा आहे, प्रतिष्ठित आहे असे उदात्तीकरण करणे चुकीचे आहे. याबाबतीत माणूस महत्त्वाचा नसून कृती महत्त्वाची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वाईटाला वाईटच म्हटले पाहिजे. आज जेव्हा अशी चळवळ उभी राहिली आहे, तेव्हा भविष्यात महिलांवर अन्याय करायला लोक घाबरतील. ही एक चांगली सुरुवात आहे. तिला प्रत्येकाने पाठिंबा दिला पाहिजे. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये. महिलांनी वेळीच चुकीच्या गोष्टींचा प्रतिकार करावा. मनात ठेवू नये, घाबरू नये.प्रश्न : फिल्म इंडस्ट्रीची म्हणून एक ‘विशाखा’ समिती असावी का?उत्तर : फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर सगळीकडेच महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या बाबतीत चुकीचे होत असेल तर प्रसारमाध्यमांकडेही त्या व्यक्त होतात. फिल्म इंडस्ट्री ही वेगळ्या प्रकारची संस्था आहे. कलाकारांची कुठलीही संघटना नसते. त्यामुळे हे कसे अस्तित्वात येऊ शकेल माहीत नाही, पण तसे काही झाले तर चांगलेच होईल. फिल्म इंडस्ट्रीतल्या पुरुषांनाही त्याचा धाक वाटेल.प्रश्न : तू आज इतके वर्षे इंडस्ट्रीत आहेस. तुझे काय निरीक्षण, अनुभव सांगशील?उत्तर : इंडस्ट्रीत आणि सगळीकडेच वाईट माणसं असतात तशी चांगलीही माणसंदेखील असतात. चुकीचे वागणाºयांना तिथल्या तिथेच सरळ केले पाहिजे. प्रत्येक बाईने आपण काम करत असलेल्या ठिकाणी चांगल्या लोकांची सपोर्ट सिस्टीम तयार ठेवली पाहिजे. दुर्दैवाने असे काही घडत असेल तर ती तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्हाला वाचवेल. यासाठी तुमचे वागणेही महत्त्वाचे ठरते.

टॅग्स :NashikनाशिकMetoo Campaignमीटू