शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पारा चाळिशीपार नाशिक पुन्हा तापलंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:13 IST

एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.

नाशिक : एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आठवड्यावर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांसह त्यांचे नेतेही घामाघुम होऊन प्रचारासाठी उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे शहराचे हवामान दमट झाले असून, शहराच्या वातावरणात उष्मा वाढला आहे. एप्रिलअखेर शहराच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. प्रखर उन्हाची तीव्रता नागरिकांनी मंगळवारी अनुभवली. कमाल तापमान ४०.१ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. किमान तापमान २०.३ अंश इतके नोंदविले गेले. कमाल व किमान तापमानात होणाऱ्या वाढीमुळे वातावरणात कमालीचा उष्मा आणि रात्री उकाडाही जाणवू लागला आहे.त्यामुळे दिवसाचा उष्मा आणि रात्रीचा उकाडा नाशिककरांना असह्य होऊ लागला आहे. चालू महिन्यात १३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.७ अंशांपर्यंत गेले होते. आठवडाभरानंतर तापमानाने चाळिशी गाठली आहे. गेल्या महिन्यात २८ तारखेला या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.४ इतके कमाल तापमान नोंदविले गेले. एकूणच मार्च महिन्यापासून नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. चालू महिनाअखेरही तापमानाने चाळिशी गाठल्याने महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत पारा मार्च महिन्यातील तापमानाची नोंद मोडून काढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिल्लीच्या हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार आहे. या पाच दिवसांत या राज्यांत उष्णतेचा कहर होणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. नागरिकांनी पुढील तीन ते चार दिवस विशेष खबरदारी घेत उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यावर भर देण्याची गरज आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण