शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

पारा चाळिशीपार नाशिक पुन्हा तापलंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:13 IST

एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.

नाशिक : एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आठवड्यावर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांसह त्यांचे नेतेही घामाघुम होऊन प्रचारासाठी उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे शहराचे हवामान दमट झाले असून, शहराच्या वातावरणात उष्मा वाढला आहे. एप्रिलअखेर शहराच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. प्रखर उन्हाची तीव्रता नागरिकांनी मंगळवारी अनुभवली. कमाल तापमान ४०.१ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. किमान तापमान २०.३ अंश इतके नोंदविले गेले. कमाल व किमान तापमानात होणाऱ्या वाढीमुळे वातावरणात कमालीचा उष्मा आणि रात्री उकाडाही जाणवू लागला आहे.त्यामुळे दिवसाचा उष्मा आणि रात्रीचा उकाडा नाशिककरांना असह्य होऊ लागला आहे. चालू महिन्यात १३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.७ अंशांपर्यंत गेले होते. आठवडाभरानंतर तापमानाने चाळिशी गाठली आहे. गेल्या महिन्यात २८ तारखेला या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.४ इतके कमाल तापमान नोंदविले गेले. एकूणच मार्च महिन्यापासून नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. चालू महिनाअखेरही तापमानाने चाळिशी गाठल्याने महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत पारा मार्च महिन्यातील तापमानाची नोंद मोडून काढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिल्लीच्या हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार आहे. या पाच दिवसांत या राज्यांत उष्णतेचा कहर होणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. नागरिकांनी पुढील तीन ते चार दिवस विशेष खबरदारी घेत उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यावर भर देण्याची गरज आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण