शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहराचा पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:15 IST

शहराचा पारा चार दिवसांपूर्वी थेट १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू लागला होता; मात्र अचानकपणे पुन्हा तापमानाचा पारा वेगाने चढल्याने वातावरणातून थंडी गायब झाली असून, नागरिकांना उष्मा अनुभवयास येत आहे.

ठळक मुद्देतापमान १७.१ : वातावरणात थंडीऐवजी जाणवतोय उष्मा

नाशिक : शहराचा पारा चार दिवसांपूर्वी थेट १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू लागला होता; मात्र अचानकपणे पुन्हा तापमानाचा पारा वेगाने चढल्याने वातावरणातून थंडी गायब झाली असून, नागरिकांना उष्मा अनुभवयास येत आहे. रविवारी (दि.१५) शहराचे किमान तापमान १७.१ अंश, तर कमाल तापमान ३१.५ अंशांपर्यंत नोंदविले गेले.

दिवाळीत थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली होती; मात्र वसुबारसनंतर शहराच्या किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागल्याने वातावरणातील गारवा कमी झाला. गुरुवारी सकाळी थंडीचा जोरदार कडाका नाशिककरांनी अनुभवला. पारा थेट १०.४ अंशांपर्यंत खाली सरकला होता. त्याचप्रमाणे कमाल तापमानदेखील घसरू लागले होते. बुधवारी कमाल तापमान थेट २७.८ अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र वसुबारस होताच पुन्हा शहराच्या किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने वातावरणातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना सध्या येत आहे. नागरिकांनी थंडीची सुरुवात झाली म्हणून उबदार कपडे वापरण्यास काढले; मात्र दोन ते तीन दिवसांतच पुन्हा लहरी निसर्गाने आपले रूप बदलल्याने वातावरणातही दमटपणा वाढला. परिणामी उबदार कपड्यांचा वापर थांबला.सध्यातरी वातावरणात उष्मा जाणवत असला तरीदेखील थंडीचे पुन्हा पुढील आठवड्यात जोरदार आगमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोव्हेंबरअखेरीस नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान