शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

शहराचा पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:15 IST

शहराचा पारा चार दिवसांपूर्वी थेट १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू लागला होता; मात्र अचानकपणे पुन्हा तापमानाचा पारा वेगाने चढल्याने वातावरणातून थंडी गायब झाली असून, नागरिकांना उष्मा अनुभवयास येत आहे.

ठळक मुद्देतापमान १७.१ : वातावरणात थंडीऐवजी जाणवतोय उष्मा

नाशिक : शहराचा पारा चार दिवसांपूर्वी थेट १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू लागला होता; मात्र अचानकपणे पुन्हा तापमानाचा पारा वेगाने चढल्याने वातावरणातून थंडी गायब झाली असून, नागरिकांना उष्मा अनुभवयास येत आहे. रविवारी (दि.१५) शहराचे किमान तापमान १७.१ अंश, तर कमाल तापमान ३१.५ अंशांपर्यंत नोंदविले गेले.

दिवाळीत थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली होती; मात्र वसुबारसनंतर शहराच्या किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागल्याने वातावरणातील गारवा कमी झाला. गुरुवारी सकाळी थंडीचा जोरदार कडाका नाशिककरांनी अनुभवला. पारा थेट १०.४ अंशांपर्यंत खाली सरकला होता. त्याचप्रमाणे कमाल तापमानदेखील घसरू लागले होते. बुधवारी कमाल तापमान थेट २७.८ अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र वसुबारस होताच पुन्हा शहराच्या किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने वातावरणातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना सध्या येत आहे. नागरिकांनी थंडीची सुरुवात झाली म्हणून उबदार कपडे वापरण्यास काढले; मात्र दोन ते तीन दिवसांतच पुन्हा लहरी निसर्गाने आपले रूप बदलल्याने वातावरणातही दमटपणा वाढला. परिणामी उबदार कपड्यांचा वापर थांबला.सध्यातरी वातावरणात उष्मा जाणवत असला तरीदेखील थंडीचे पुन्हा पुढील आठवड्यात जोरदार आगमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोव्हेंबरअखेरीस नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान