शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा संप मागे : व्यापाऱ्याकडून अडवणूक होत असल्याची भावना

By admin | Updated: July 25, 2016 23:39 IST

गोणी पद्धतीला तीव्र विरोध

देवळा : दोन आठवड्यापासून देवळा कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान कांदा व्यापाऱ्यांनी सुरु केलेला संप मागे घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी गोणी पद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली असून यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे. पूर्वीचीच लिलाव पद्धत व्यापाऱ्यांनी सुरु करावी, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.यापुढे आडत ही कांदा खरेदीदाराकडूनच वसुली केली जाणार असली तरी व्यापाऱ्यांनी गोणीपद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने निवड करुन गोणीत भरुन आणावा लागणार आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंतीत झाला असून व्यापाऱ्यांनी हे अडवणूकीचे धोरण अवलंबल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा गोणीत भरुन आणल्यास त्याचा लिलाव करण्यात येईल व शेतकऱ्यांकडून आडत घेतली जाणार नाही अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे तर शेतकऱ्यांचा ह्या गोणी पद्धतीला विरोध असल्याने सोमवारी दि. २५ रोजी देवळा येथे कांद्याचे लिलाव होऊ शकले नाही. निफाड - शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला आणताना कांदा गोणीत भरुन आणावा या चुकीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी सायखेडा मार्केट मध्ये बाजार समितीचे संचालक, व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी यांची संयुक्त बैठक सायखेडा येथे संपन्न झाली. या बैठकीत पिंपळगाव बाजार समिती संचालक गोकुळ गिते यांनी शेतकरी अन व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीची भूमिका बाजार समिती करत असुन सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी भरडला जात आहे. सायखेडा व्यापारी असोसिएसनचे अध्यक्ष सुरेश कमानकर यांनी आम्हाला अडत बंद झाल्याने कांदा खरेदी परवडत नाही तर शेतकरी प्रभाकर रायते यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट बंद असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गोणीत कांदा विक्र ी करणे परवडनारे नसून उलट अडतीपेक्षा जादा खर्च येतो त्यामुळे गोणीने विक्र ी करणे शेतकऱ्यांना परवडनारे नसून उलट खर्च वाढणार आहे. बाजार समिती संचालक विजय कारे यांनी बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा सध्या पडून असुन सडत आहे . त्यामुळे लवकरात लवकर निर्णय होने गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. अश्पाक शेख यांनी १५ दिवसांपासून मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांबरोबरच मार्केटवर अवलंबून असणाऱ्या घटकांवर संकट कोसळले आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मरण होत आहे. असे मत यावेळी व्यक्त केले येत्या शुक्र वारी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत गोणीत कांदा लिलावासाठी आणण्याच्या निर्णयास तीव्र विरोध करण्यात यावेळी अश्पाक शेख, विजय कारे, गोकुळ गिते, सुरेश कमानकर, प्रभाकर रायते, नारायण वरखेडे, दत्तात्रय खालकर आदी सह शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)