शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नांदूरमधमेश्वर कालवा विकासासाठी सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:02 IST

सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार कार्यक्रम नुकताच मंत्रालयामध्ये पार पडला.

ठळक मुद्देधरण लाभक्षेत्रातील ५००० एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचना खाली आणण इत्यादी उद्देश

सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार कार्यक्रम नुकताच मंत्रालयामध्ये पार पडला.याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव प्रवीण परदेशी, राजेंद्र पवार, डॉ. संजय बेलसरे, जे.व्ही.आर. मूर्ती, सुनील पोटे, पद्मभूषण देशपांडे उपस्थित होते. सततचा दुष्काळ व पाण्याचा तुटवडा असणाऱ्या औरंगाबाद जिल्हातील वैजापूर, गंगापूर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये शेतीच्या सिंचनाची गरज भागविण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणामधून २००४ साली १२५ कि.मी.चे पाटाचे जाळे तयार करण्यात आले.जलसंपदा विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनातून व युवामित्र संस्थेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतून उपक्रम राबविण्यात येणार असून, उपक्रमाद्वारे, पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी व समन्यायी पाणी वाटपासाठी १२३ पाणीवापर संस्थांची क्षमता बांधणी करणे, धरण लाभक्षेत्रातील ५००० एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचना खाली आणण इत्यादी उद्देश साध्य केले जाणार आहेत. सदर कार्यक्रमाद्वारे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील ३ तालुके व १०४ गावांमधील ५५ हजार कुटुंबांना प्रत्यक्ष फायदा होणार असून, सुमारे १.०८ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविल्या जाणाºया या प्रकल्पांतर्गत शासकीय यंत्रणा, लाभक्षेत्रातील शेतकरी, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट - देणगीदार संस्था यांचा सहभाग मिळणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण