शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे बैठकांना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 00:58 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने गावपुढाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर होताच गावपातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. गावोगावी पॅनलनिर्मितीसाठी आतापासूनच कोपरा बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या मोसमात गावागावांत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देहालचाली गतिमान : पॅनलनिर्मितीसाठी उमेदवारांची चाचपणी

नायगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने गावपुढाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर होताच गावपातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. गावोगावी पॅनलनिर्मितीसाठी आतापासूनच कोपरा बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या मोसमात गावागावांत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

गावगाड्याची अर्थातच ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल वाजताच गावपुढाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सिन्नर तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या जाहीर झाल्यापासून गावखेड्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांच्या हरकती व सूचना ७ डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार याद्याच येणाऱ्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत.

सर्वाधिक चुरशीची व डावपेचांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे बघितले जाते. काल-परवा बरोबर फिरणारे आत्ता दुसऱ्यांच्या शोधात, तर कोणता उमेदवार पॅनलसाठी फायद्याचा, या शोधात गावपुढारी सध्या चाचपणी करत आहेत. शासनाने गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आहेत. त्यातच गावपातळीवर विकासकामांसाठी थेट व भरघोस निधी मिळत असल्याने या निवडणुकांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष

गावपातळीच्या निवडणुका म्हणजे अस्सल डावपेचांचा खेळ असे बोलले जाते. त्याचाच पहिला अंक म्हणजे पॅनलनिर्मिती. योग्य व मतदारांचा मोठा भरणा मागे असलेला उमेदवार शोधून आपल्या गटात सामील करणे आदी बाबींचा विचार करण्यासाठी सध्या प्राथमिक स्वरूपाच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. अजून सरपंचपदाचे आरक्षण बाकी असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांच्या नजरा सोडतीकडे लागून आहेत. या आरक्षण सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने रणधुमाळीला रंग चढणार आहे. नायगाव खोऱ्यातील नायगाव, देशवंडी, वडझिरे व ब्राह्मणवाडे आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या हालचालीकडे खोऱ्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक