शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:48 IST

शासनाकडून विकासकामांसाठी निधी प्राप्त होऊनही तो खर्च करण्याबाबत उदासीन असलेले खातेप्रमुख, पदाधिकारी, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास केली जाणारी टाळाटाळ पाहता जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ तहकूब करावी लागली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अखर्चित निधीवरून कारवाईची मागणी

नाशिक : शासनाकडून विकासकामांसाठी निधी प्राप्त होऊनही तो खर्च करण्याबाबत उदासीन असलेले खातेप्रमुख, पदाधिकारी, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास केली जाणारी टाळाटाळ पाहता जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ तहकूब करावी लागली आहे. दोन ते तीन वर्षे निधी अखर्चित ठेवणाºया अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत बाळासाहेब क्षीरसागर, आत्माराम कुंभार्डे यांनी जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीचा विषय मांडला. शासनाकडून विकासकामांसाठी निधी प्राप्त होऊनही नियोजनाअभावी निधी अखर्चित राहत असून, अखेरीस हा निधी शासनाला परत जात असल्याची बाब गंभीर असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.बांधकाम एक, दोन व तीन विभागांचा कोट्यवधीचा निधी का खर्च होऊ शकला नाही, असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर बांधकाम विभागाकडून आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. शासनाकडे परत गेलेल्या निधीला डिसेंबर २०१९ पर्यंत मुदत वाढ मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असे लेखा विभागाकडून सांगण्यात आले. निधी परत जाण्याऐवजी तो खर्च करण्यासाठी मुदतवाढ मागता येईल, असेही सांगण्यात आले. त्यावर अधिकाºयांकडून निधी खर्च करण्याचे नियोजन केले जात नाही असे सांगून कुंभार्डे यांनी, निधी किती मिळणार हे माहीत असूनही प्रस्ताव तयार करण्यास विलंब केला जातो, त्यानंतर निविदा मागविल्या जात नाही परिणामी कोणतेही काम पुढे सरकत नसल्याचे सांगितले. त्यावर प्रभारी अतिरिक्तमुख्य कार्यकारी उज्ज्वला बावके यांनी अवघे १३ कोटींचा निधी अखर्चित राहिल्याचे सांगितले. त्यांचा मुद्दा बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी खोडून काढत, बांधकाम विभागाच्या आढाव्यात सुमारे ५० कोटींहून अधिक निधी अखर्चित राहिल्याने परत गेल्याचे सांगून, त्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा ठराव बांधकाम समितीच्या सभेत करण्यात आला, परंतु त्याला दाद मिळालीनाही. अधिकाºयांकडून सभापतीलाच माहिती दिली जात नसल्याबद्दल त्यांनी हतबलता व्यक्त केली.जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनीही सदरची बाब गंभीरपणे घेत, अखर्चित निधीवरून जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्हा परिषदेची नामुष्की झाल्याचे सांगितले. निधी अखर्चित ठेवणाºया अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.आचारसंहितेपूर्वी कामाचे नियोजन का केले नाही, अशी विचारणा करून आचारसंहिता लागण्याच्या आदल्या दिवशी बांधकाम विभागाने लेखा विभागाकडे निधीसाठी फाइली पाठविल्याचे त्या म्हणाल्या.या विषयावर उपाध्यक्ष नयना गावित, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, शिक्षण सभापती यतिन पगार, भास्कर गावित यांनीही तक्रारी केल्या. त्यामुळे अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत सभा तहकुबीची सूचना मांडण्यात आली.लेखा विभागाकडे बोटलेखा विभागाकडून लवकर निधी वितरीत होत नसल्यामुळे निधी खर्च करण्यात अडचणी येत असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे असून, त्यासाठी लेखा विभागात टेंडर कारकून तसेच कर्मचाºयांची संख्या कमी असल्याच्या कारणाने महिनोमहिने फाइली पडून असल्याचे सांगण्यात आले. त्यावर लेखा विभागाने सदरचे आक्षेप फेटाळून लावले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMONEYपैसा