शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पाणीप्रश्न सुटेपर्यंत सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:11 IST

महापालिकेच्या पूर्व प्रभागातील प्रभाग क्र मांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्व सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी (दि. ५) पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत सभात्याग केला.

ठळक मुद्देपूर्व प्रभाग सभा : कृत्रिम टंचाईने सदस्य आक्रमक

इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभागातील प्रभाग क्र मांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्व सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी (दि. ५) पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत सभात्याग केला.पूर्व प्रभाग सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ५) सभा झाली. यावेळी गेल्या तीन सभेत एकही विषय विषयपत्रिकेवर न आल्याने अधिकारीवर्ग कामे करीत नसल्याचा आरोप सय्यद मुशीर यांनी केला. शहरात चिकुनगुनियासदृश, डेंग्यूसदृश आणि स्वाइन फ्लू आजारासाठी आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने अद्यापही नियंत्रणात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. औषध व धूर फवारणी फक्त ‘रोड शो’ ठरत असल्याचा आरोप सुषमा पगारे यांनी केला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी लावण्यात आलेली घसरगुंडी खेळणी अर्धी तुटल्याने संबंधित विभागाने तेवढीच काढून नेली, त्यामुळे लहान बालके अद्यापही अर्धवट तुटलेल्या घसरगुंडीवर खेळत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आशा तडवी यांनी वर्तविली. प्रभाग ३० मधील अनेक ठिकाणी केरकचरा उचलला जात नाही त्यातच डेंगू सदृश्य आणि चिकन गुनिया सदृश्य आजाराचे रु ग्ण वाढत चालले आहे मग कार्यक्षम आयुक्त नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष का देत नाही? असा प्रश्न सतीश सोनवणे यांनी केला.पांडवनगरी, श्रद्धाविहार कॉलनी, एकता कॉलनी, राजीवनगर याच संपूर्ण प्रभागात गेल्या तीन वर्षांपासून कृत्रिम पाणीटंचाई पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे निर्माण होत असल्याने संतप्त झालेले प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी या तिघांनी सभागृहात जोपर्यंत कृत्रिम पाणीटंचाईसंपत नाही, तोपर्यंत सभागृहातयेणार नाही असे म्हणत सभात्याग करीत प्रशासनाचा निषेध केला.कृत्रिम पाणीटंचाईप्रभाग क्रमांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अनेकदा आंदोलन करूनही पाणीप्रश्न सुटत नसल्याने प्रभागाच्या तिघेही नगरसेवकांचा शुक्रवारी (दि. ५) संताप झाला. यावेळी सर्व सदस्यांनी त्यांना साथ दिली. तसेच महिला सदस्य तोंडाला मास्क लावून सभेत बसले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई