शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मांजरपाडा प्रकरणी प्रकल्पग्रस्त, स्थानिकांची मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:37 IST

मांजरपाडा वळण योजनेतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाझर तलाव, केटी बंधारे बांधून देण्याची तयारी दर्शविल्याने स्थानिकांनी मांजरपाडा वळण योजनेचे काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, आश्वासनाप्रमाणे पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा योजनेचे काम बंद पाडण्याचा इशारा पाटबंधारे विभागास देण्यात आला आहे.

दिंडोरी : मांजरपाडा वळण योजनेतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाझर तलाव, केटी बंधारे बांधून देण्याची तयारी दर्शविल्याने स्थानिकांनी मांजरपाडा वळण योजनेचे काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, आश्वासनाप्रमाणे पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा योजनेचे काम बंद पाडण्याचा इशारा पाटबंधारे विभागास देण्यात आला आहे.  ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत मांजरपाडा वळण योजनेचे काम प्रगतिपथावर असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र सदर प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असले तरी प्रकल्पग्रस्त व बाधित असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या आठ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत पाटबंधारे विभागाने कुठलीही सकारात्मक कार्यवाही केली गेली नाही. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी स्थानिक आदिवासी समाजास खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण होऊन १६ एप्रिल रोजी आमदार नरहरी झिरवाळ, पंचायत समितीचे सभापती एकनाथ गायकवाड, कार्यकारी अभियंता सिंघानी यांना ग्रामस्थ व महिलांनी देवसाने येथील मारु ती मंदिरात कोंडून मांजरपाडा योजनेचे काम बंद पाडले होते. यानंतर पाटबंधारे विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेत ग्रामस्थांच्या मागण्यांबाबात कार्यवाहीसाठी प्रयत्न सुरू केले होते.  यावेळी सचिव व उपायुक्तांनी स्थानिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत चारणवाडीसह देवसाने शिवारात तीन तलाव तसेच उनंदा नदीवर दोन केटी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच शेतकºयांना पाणी परवानग्या मिळवून देण्याबाबत सुचना अधिकाºयांना केल्या.जलसंपदा मंत्र्याच्या उपस्थितीत चर्चाआंदोलनानंतर २१ एप्रिल रोजी आमदार नरहरी झिरवाळ, कार्यकारी अभियंता अलका आहिरराव, उपअभियंता सिंघानिया, शाखा अभियंता दराडे आदी अधिकाºयांनी वणी येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामस्थांशी मागण्यांबाबत चर्चा केली होती. मागण्यांबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. यावेळी मागण्यांबाबत मंत्रालयातील जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात आधिकाºयांच्या उपस्थित मागण्यांबाबत चर्चा झाली.

टॅग्स :DamधरणGirish Mahajanगिरीश महाजन