शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

जागतिक पर्यटनवाढीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची : सुधीर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:00 IST

‘लेखक तुमच्या भेटीला’ या व्याख्यानमालेत रविवारी (दि.२) ‘जागतिक पर्यटन : एक आनंदपर्वणी’ याविषयावर पाटील यांची मुलाखत घेण्यात आली.

ठळक मुद्देपंधरवड्यात केरळचे पर्यटन होईल सुरळीत सुरक्षित नैसर्गिक पर्यटनस्थळांपैकी एक पर्यटनस्थळ म्हणजे केरळ

नाशिक : काळानुरूप जागतिक पर्यटनाचा विस्तार होत गेला. आधुनिकतेच्या काळात जग जवळ आले असून, पर्यटनाला मोठा वाव मिळत आहे. प्रवासाकरिता सुलभ साधने उपलब्ध झाली आणि माध्यमांच्या गतिमान प्रगतीमुळे पर्यटनवृद्धीला मोठा हातभार लागला. पर्यटनाविषयीची आवड जनसामान्यांमध्ये अधिकाधिक निर्माण करण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले. त्यामुळे जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना मिळत गेली, असे प्रतिपादन पर्यटन व्यावसायिक सुधीर पाटील यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या व्याख्यानमालेत रविवारी (दि.२) ‘जागतिक पर्यटन : एक आनंदपर्वणी’ याविषयावर पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुलाखतकार रविराज गंधे यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून पाटील यांचा जीवनप्रवासापासून जागतिक स्तरावर पर्यटनाला मिळणारा वावपर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले, जगभ्रमंती केल्यानंतर सर्वाधिक सुरक्षित व चांगला देश केवळ भारत आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहचलो. पर्यटनाला भारतात मोठा वाव आहे, यात शंका नाही. दुर्दैव एवढेच की पर्यटन क्षेत्राकडे भारतात अद्याप औद्योगिक दृष्टिकोनातून बघितले जात नाही. लेह-लडाखचाही त्यांनी उल्लेख करत येथील निसर्गसौंदर्य, डोंगरदऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य अद्भूत असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर पर्यटनवाढीचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे विविध खेळांच्या होणाºया स्पर्धांचे आयोजन हेदेखील आहे. कारण जगाच्या कानाकोपºयात क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत विविध खेळांचे चाहते आहे. त्यामुळे अशा खेळांच्या होणाºया स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी ते चाहते पर्यटन करत असतात, असे पाटील म्हणाले. यावेळी लेह-लडाखची लघुचित्रफितही दाखविण्यात आली.पंधरवड्यात केरळचे पर्यटन होईल सुरळीतपर्यटनावरच केरळचे सरकार अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही. पुरामुळे पर्यटनाला मोठा फटका जरी बसला असला तरी येत्या पंधरवड्यात कोच्ची ते त्रिवेंद्रमपर्यंतचे केरळचे पर्यटन सुरळीत झाल्याचे आपल्याला पहावयास मिळेल, कारण तेथे प्रत्येक व्यक्ती एकत्र येऊन त्यासाठी झटत आहे, असेही पाटील यांनी यावेळी अधोरेखित केले. भारतात चांगल्या, सुंदर, सुरक्षित नैसर्गिक पर्यटनस्थळांपैकी एक पर्यटनस्थळ म्हणजे केरळ आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारतKerala Floodsकेरळ पूर