शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

उपाययोजना : समुपदेशक करणार कर्मचाºयांचे प्रबोधन एसटी कर्मचारी तणावात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:51 AM

नाशिक : कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने मानसिक समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णय कर्मचारी मानसिक तणावात असल्याची कबुली देण्यासारखाच मानला जात आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावनामहामंडळात अंतर्गत बरीच धुसफूस

नाशिक : कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने मानसिक समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णय कर्मचारी मानसिक तणावात असल्याची कबुली देण्यासारखाच मानला जात आहे. सध्या एसटी कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न तसेच काही विभाग बंद करण्याच्या निर्णयामुळे कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना आली असल्याने त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी महामंडळाला समुपदेशकाची गरज भासू लागली असल्याची चर्चा महामंडळात सुरू आहे.राज्य परिवहन महामंडळातील सध्याचे वातावरण अस्थिरतेचे असून, वेतनाच्या प्रश्नापासून ते खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या रेट्यामुळे कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. एकीकडे कोट्यवधीचे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत, तर दुसरीकडे कर्मचाºयांची भरती आणि वेतनाच्या मुद्द्यावरून सरकारकडून ठोस भूमिका जाहीर केली जात नाही. त्यामुळे सध्या महामंडळात अंतर्गत बरीच धुसफूस असल्याने सारे वातावरणच गढूळ झाले आहे. कर्मचाºयांच्या आपसातील कुरबुरी, ड्यूटीचा टाइम, ड्यूटी मिळणे न मिळणे, इन्क्रिमेंट, सुटी, बदल्या आणि वेतन अशा अनेक बाबतीत कर्मचाºयांमध्ये काहीसा असंतोष आहे. कर्मचारी प्रचंड मानसिक दडपणात असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. महामंडळाच्या अनाकलनिय निर्णयांमुळे एकीकडे कर्मचारी गोंधळलेले असतानाच महामंडळाने कर्मचाºयांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचारी तणावात असल्याच्या मुद्द्याला पुष्टी मिळाल्याचा दावा कर्मचारी वर्गाकडून केला जात आहे. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांमध्ये समुपदेशनाद्वारे मानसिक ताणतणावाचे निराकरण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून, अडीअडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे तसेच आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचारासाठी गरज निदर्शनास आणून देण्यासाठी समुपदेशकांना मानद स्वरूपात नेमणूक दिली जाणार आहे. कर्मचाºयांना ताणतणावातून बाहेर काढण्यासाठी महामंडळाने एक वर्षासाठी समुपदेशक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. मानद तत्त्वावर सदर नेमणूक केली जाणार असल्याने त्यानंतर त्यांची नेमणूक पुढे करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. समुपदेशकांना मासिक चार हजार रुपये इतके मानधन देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. समुपदेशकांनी प्रत्येक आगारात महिन्यातून किमान तीन वेळेला भेट देऊन कर्मचाºयांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला आहे. ही केवळ मानद सेवा असल्याने संबंधितांना केवळ मानधनच दिले जाणार आहे.महिला कर्मचाºयांना मिळेल सुरक्षाराज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचा प्रकार जळगाव येथे नुकताच समोर आला आहे. एस.टी.च्या एका कर्मचाºयाने कंडक्टर महिलेची छेड काढून तिला अश्लील लघुसंदेश पाठविले आणि हात धरण्याचाही प्रयत्न केल्याप्रकरणी त्या कर्मचाºयाला शिवसेनेच्या महिला शाखेने चांगलाच चोप दिला होता. या घटनेचे वृत्त एस.टी. कर्मचाºयांच्या भ्रमणध्वनीवर आल्यानंतर अनेकांनी स्थानिक पातळीवरील प्रकाराला आळा घालण्यासाठी समुपदेशन चांगला पर्याय ठरू शकेल असे मत खासगीत व्यक्त केलेच; शिवाय महिलांना संबंधित समुपदेशकाकडे जाऊन होणारा मानसिक त्रास सांगणे सोपे होणार असल्याने महिलांच्या सुरक्षितेतासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत महिला कर्मचाºयांनी व्यक्त केले. राज्यातील सर्व विभागांमध्ये मानद तत्त्वावर समुपदेशकाची नेमणूक करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य या विषयावरील पदव्युत्तर पदवी (एमएसडब्ल्यू) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी बंधनकारक आहे. किंवा मानसशास्त्र विषय घेऊन पदवी पूर्ण करणाºयांनाही अर्ज करण्याची संधी आहे. समुपदेशकाला केवळ मानधन ४००० रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला आगारात कर्मचाºयांशी संपर्कात रहावे लागणार आहे. आगारात महिन्यातून तीनवेळेस भेटी देणे बंधनकारक आहे. निमित्त काहीही असले तरी कर्मचाºयांना मानसिक सक्षम करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी समुपदेशकाची गरज एस.टी. महामंडळाला वाटल्याने या निर्णयामुळे कर्मचारी कितपत सक्षम, समजदार आणि दक्ष होतात याकडे महामंडळाचे लक्ष नक्कीच असणार आहे.