शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:17 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : नेत्यांचे दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त; पाणी टंचाईची भिती

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे. कमी पर्जन्यमानामुळे अनेक गावांमध्ये आता पासुनच पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच अवघे ७१ टक्केच भरलेल्या मुकणे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे आवर्तन सुरु आहे, त्यामुळेच या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या तोंडचे पाणि पळाले आहे.जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध झाला होता, मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ५ नोव्हेबरला दारणा, मुकणे धरणातून हजारो द.ल.घ.फु. पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. दारणा धरणातून - २८४२ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून ३६४ द.ल.घ.फु. पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मात्र दारणा धरणातून आज पर्यंत ३२७८ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून १५ नोव्हेबर पासून ते आजपर्यंत तब्बल पाच पट म्हणजेच १६०७ द.ल.घ.फु. पाणी वैजापूर एक्सप्रेस कॅनॉलसाठी सोडण्यात आलेले असुन अजूनही दोन तीन दिवस हे पाणी सुरुच राहणार आहे. दारणा धरणात फक्त २३९० द.ळ.घ.फु. तर मुकणे धरणात फक्त ३०६२ द.ल. घ.फु. पाणीसाठा शिल्लक राहिले आहे.दरम्यान जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध करणाºया नेत्यांना मात्र महीन्याभरपासुन या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होणारे पाणी दिसत नाही का? ते आज का गप्प आहेत? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. आताच मुकणे धरणाचा साठा कमी झाल्याने पाइप जोडून विद्युत पंप शेतकºयांना पाण्यापर्यंत पोहोचवावे लागत आहेत. तेंव्हा उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिक भयानक होईल असे शेतकरी बोलत आहेत........विशेष म्हणजे याच मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी ही पाणी उचलण्यात येणार असून त्याच्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जर नाशिकचे पाणी राखीव ठेवले तर शेतकºयांना किती पाणी मिळणार हा ही एक प्रश्न आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्याबरोबरच नाशिक शहरालाही पाणी टंचाइस सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास इगतपुरी तालुक्याला तीव्र पाणी टंचाईची भिती वाटू लागली आहे.