शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:17 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : नेत्यांचे दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त; पाणी टंचाईची भिती

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे. कमी पर्जन्यमानामुळे अनेक गावांमध्ये आता पासुनच पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच अवघे ७१ टक्केच भरलेल्या मुकणे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे आवर्तन सुरु आहे, त्यामुळेच या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या तोंडचे पाणि पळाले आहे.जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध झाला होता, मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ५ नोव्हेबरला दारणा, मुकणे धरणातून हजारो द.ल.घ.फु. पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. दारणा धरणातून - २८४२ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून ३६४ द.ल.घ.फु. पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मात्र दारणा धरणातून आज पर्यंत ३२७८ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून १५ नोव्हेबर पासून ते आजपर्यंत तब्बल पाच पट म्हणजेच १६०७ द.ल.घ.फु. पाणी वैजापूर एक्सप्रेस कॅनॉलसाठी सोडण्यात आलेले असुन अजूनही दोन तीन दिवस हे पाणी सुरुच राहणार आहे. दारणा धरणात फक्त २३९० द.ळ.घ.फु. तर मुकणे धरणात फक्त ३०६२ द.ल. घ.फु. पाणीसाठा शिल्लक राहिले आहे.दरम्यान जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध करणाºया नेत्यांना मात्र महीन्याभरपासुन या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होणारे पाणी दिसत नाही का? ते आज का गप्प आहेत? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. आताच मुकणे धरणाचा साठा कमी झाल्याने पाइप जोडून विद्युत पंप शेतकºयांना पाण्यापर्यंत पोहोचवावे लागत आहेत. तेंव्हा उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिक भयानक होईल असे शेतकरी बोलत आहेत........विशेष म्हणजे याच मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी ही पाणी उचलण्यात येणार असून त्याच्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जर नाशिकचे पाणी राखीव ठेवले तर शेतकºयांना किती पाणी मिळणार हा ही एक प्रश्न आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्याबरोबरच नाशिक शहरालाही पाणी टंचाइस सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास इगतपुरी तालुक्याला तीव्र पाणी टंचाईची भिती वाटू लागली आहे.