शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:17 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : नेत्यांचे दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त; पाणी टंचाईची भिती

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे. कमी पर्जन्यमानामुळे अनेक गावांमध्ये आता पासुनच पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच अवघे ७१ टक्केच भरलेल्या मुकणे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे आवर्तन सुरु आहे, त्यामुळेच या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या तोंडचे पाणि पळाले आहे.जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध झाला होता, मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ५ नोव्हेबरला दारणा, मुकणे धरणातून हजारो द.ल.घ.फु. पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. दारणा धरणातून - २८४२ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून ३६४ द.ल.घ.फु. पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मात्र दारणा धरणातून आज पर्यंत ३२७८ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून १५ नोव्हेबर पासून ते आजपर्यंत तब्बल पाच पट म्हणजेच १६०७ द.ल.घ.फु. पाणी वैजापूर एक्सप्रेस कॅनॉलसाठी सोडण्यात आलेले असुन अजूनही दोन तीन दिवस हे पाणी सुरुच राहणार आहे. दारणा धरणात फक्त २३९० द.ळ.घ.फु. तर मुकणे धरणात फक्त ३०६२ द.ल. घ.फु. पाणीसाठा शिल्लक राहिले आहे.दरम्यान जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध करणाºया नेत्यांना मात्र महीन्याभरपासुन या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होणारे पाणी दिसत नाही का? ते आज का गप्प आहेत? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. आताच मुकणे धरणाचा साठा कमी झाल्याने पाइप जोडून विद्युत पंप शेतकºयांना पाण्यापर्यंत पोहोचवावे लागत आहेत. तेंव्हा उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिक भयानक होईल असे शेतकरी बोलत आहेत........विशेष म्हणजे याच मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी ही पाणी उचलण्यात येणार असून त्याच्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जर नाशिकचे पाणी राखीव ठेवले तर शेतकºयांना किती पाणी मिळणार हा ही एक प्रश्न आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्याबरोबरच नाशिक शहरालाही पाणी टंचाइस सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास इगतपुरी तालुक्याला तीव्र पाणी टंचाईची भिती वाटू लागली आहे.