शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेत घास पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:13 IST

परिसरातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव या भागात पशुखाद्य म्हणून ‘घास’ या पिकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घास या पिकाची लागवड करतात.

एकलहरे : परिसरातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव या भागात पशुखाद्य म्हणून ‘घास’ या पिकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घास या पिकाची लागवड करतात. परिसरातील अनेक शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अनेकांकडे गायी, म्हशी, शेळ्या दुग्धव्यवसायासाठी पालन केलेल्या आहेत. या दुधाळ जनावरांसाठी बारमाही खाद्य म्हणून घास पिकाची लागवड केली जाते.उसाची कुट्टी, कडबा, मका, हिरवे गवत हे खाद्य त्या- त्या सिझनमध्ये मिळते. मात्र घास हा बाराही महिने दुधाळ जनावरांसाठी मिळू शकतो. एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे परिसरातील बहुतेक शेतकरी मोठ्या प्रमाणात घासची लागवड करून घरच्या जनावरांसाठी वैरण म्हणून वापरतात. परंतु काही शेतकरी याचा व्यापारही करतात. व्यापारी वापरासाठी दोन-चार बिघे घास पेरून तो कापून व्यापाऱ्यांना विकला जातो. व्यापारी अनेक शेतकऱ्यांचा घास बांधावरच विकत घेऊन तो बाजारामध्ये नेतात. मोठमोठ्या गोठे, तबेलेवाल्यांना व्यापारी घासचा पुरवठा करतात. नाशिक शहरालगत म्हशींचे अनेक गोठे आहेत. या गोठेवाल्यांना नियमित घास पुरवठा करणारे काही व्यापारी आहेत. शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात घेतलेल्या घासच्या प्रत्येक पेंढीमागे दोन-तीन रुपये जरी मिळाले तरी वाहतूक खर्च वजा जाता व्यापाºयांना चांगला नफा मिळतो व शेतकºयांनाही रोख पैसा मिळतो.घासची लागवड करण्यासाठी येथील शेतकरी घरीच तयार केलेले गावठी बी वापरतात. ७०० ते ८०० रुपये किलोने हे बी विकतही मिळते. बिघाभर घासची लागवड करण्यासाठी साधारण १० ते १२ किलो बी लागते. तत्पूर्वी ३ ते ४ ट्रॅक्टर शेणखत पसरून ४ फूट रुं दीचे वावरभर लांब मोठमोठे वाफे तयार करून लागवड केली जाते. पाणी भरल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी लहान घासची पहिली कापणी केली जाते. काही शेतकरी उंदीर लागू नये म्हणून एका आड एक वाफे कापतात. तर व्यापाºयाला विकण्यासाठी सरसकट कापणी केली जाते. एका वाफ्यात साधारण ५० पेढ्या घास निघतो. एक वाफा कापण्यासाठी ९० रु पये मजुरी दिली जाते. घास कापून, त्याच्या पेंंढ्या बांधून ठोक पद्धतीने १०ते १२ रुपये पेंढीप्रमाणे व्यापाºयाला बांधावरच विकला जातो. मार्च ते जून या चार महिन्यांत घासाला चांगला भाव मिळतो. एकदा लागवड करून खत पाणी वेळेवर दिले की नंतर फारशी मशागत करावी लागत नाही.कमी खर्चात उत्पन्नएकदा कापणी झाल्यावर पुन्हा २१ ते २५ दिवसांनी पूर्ण वाढ झाल्याने पुन्हा कापणी करावी लागते. कापणीची मजुरी व पेंढी बांधने या व्यतिरिक्त फारसा खर्च येत नसतो. एकदा लावलेला घास दोन ते तीन वर्षे पुरतो. त्यामुळे दर २५ दिवसांच्या अंतराने खर्च वजा जाता बिघाभर घासचे ८ ते १० हजार रु पये शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकºयाचा घरखर्च, विजेचे बील, पेट्रोलपाणी, मुलांची शाळेची शुल्क खर्च भागविला जातो. त्यामुळे इतर नगदी पिकांबरोबरच घासचे पीक उपयुक्त ठरते, असे शेतकरी सांगतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती