शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

एकलहरेत घास पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:13 IST

परिसरातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव या भागात पशुखाद्य म्हणून ‘घास’ या पिकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घास या पिकाची लागवड करतात.

एकलहरे : परिसरातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव या भागात पशुखाद्य म्हणून ‘घास’ या पिकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घास या पिकाची लागवड करतात. परिसरातील अनेक शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अनेकांकडे गायी, म्हशी, शेळ्या दुग्धव्यवसायासाठी पालन केलेल्या आहेत. या दुधाळ जनावरांसाठी बारमाही खाद्य म्हणून घास पिकाची लागवड केली जाते.उसाची कुट्टी, कडबा, मका, हिरवे गवत हे खाद्य त्या- त्या सिझनमध्ये मिळते. मात्र घास हा बाराही महिने दुधाळ जनावरांसाठी मिळू शकतो. एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे परिसरातील बहुतेक शेतकरी मोठ्या प्रमाणात घासची लागवड करून घरच्या जनावरांसाठी वैरण म्हणून वापरतात. परंतु काही शेतकरी याचा व्यापारही करतात. व्यापारी वापरासाठी दोन-चार बिघे घास पेरून तो कापून व्यापाऱ्यांना विकला जातो. व्यापारी अनेक शेतकऱ्यांचा घास बांधावरच विकत घेऊन तो बाजारामध्ये नेतात. मोठमोठ्या गोठे, तबेलेवाल्यांना व्यापारी घासचा पुरवठा करतात. नाशिक शहरालगत म्हशींचे अनेक गोठे आहेत. या गोठेवाल्यांना नियमित घास पुरवठा करणारे काही व्यापारी आहेत. शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात घेतलेल्या घासच्या प्रत्येक पेंढीमागे दोन-तीन रुपये जरी मिळाले तरी वाहतूक खर्च वजा जाता व्यापाºयांना चांगला नफा मिळतो व शेतकºयांनाही रोख पैसा मिळतो.घासची लागवड करण्यासाठी येथील शेतकरी घरीच तयार केलेले गावठी बी वापरतात. ७०० ते ८०० रुपये किलोने हे बी विकतही मिळते. बिघाभर घासची लागवड करण्यासाठी साधारण १० ते १२ किलो बी लागते. तत्पूर्वी ३ ते ४ ट्रॅक्टर शेणखत पसरून ४ फूट रुं दीचे वावरभर लांब मोठमोठे वाफे तयार करून लागवड केली जाते. पाणी भरल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी लहान घासची पहिली कापणी केली जाते. काही शेतकरी उंदीर लागू नये म्हणून एका आड एक वाफे कापतात. तर व्यापाºयाला विकण्यासाठी सरसकट कापणी केली जाते. एका वाफ्यात साधारण ५० पेढ्या घास निघतो. एक वाफा कापण्यासाठी ९० रु पये मजुरी दिली जाते. घास कापून, त्याच्या पेंंढ्या बांधून ठोक पद्धतीने १०ते १२ रुपये पेंढीप्रमाणे व्यापाºयाला बांधावरच विकला जातो. मार्च ते जून या चार महिन्यांत घासाला चांगला भाव मिळतो. एकदा लागवड करून खत पाणी वेळेवर दिले की नंतर फारशी मशागत करावी लागत नाही.कमी खर्चात उत्पन्नएकदा कापणी झाल्यावर पुन्हा २१ ते २५ दिवसांनी पूर्ण वाढ झाल्याने पुन्हा कापणी करावी लागते. कापणीची मजुरी व पेंढी बांधने या व्यतिरिक्त फारसा खर्च येत नसतो. एकदा लावलेला घास दोन ते तीन वर्षे पुरतो. त्यामुळे दर २५ दिवसांच्या अंतराने खर्च वजा जाता बिघाभर घासचे ८ ते १० हजार रु पये शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकºयाचा घरखर्च, विजेचे बील, पेट्रोलपाणी, मुलांची शाळेची शुल्क खर्च भागविला जातो. त्यामुळे इतर नगदी पिकांबरोबरच घासचे पीक उपयुक्त ठरते, असे शेतकरी सांगतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती