शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 18:59 IST

सासरच्या छळास कंटाळून शिवणगाव येथे गुरु वारी सुनंदा लक्ष्मण रणमाळे हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर (रा. रामवाडी, नाशिक) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

त्र्यंबकेश्वर : सासरच्या छळास कंटाळून शिवणगाव येथे गुरु वारी सुनंदा लक्ष्मण रणमाळे हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर (रा. रामवाडी, नाशिक) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.फिर्यादीवरून विवाहितेचा पती लक्ष्मण वाळू रणमाळे, सासू ठकूबाई वाळू रणमाळे, दीर मनोहर वाळू रणमाळे व पांडुरंग वाळू रणमाळे यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर याने म्हटले आहे की, सततचा शारीरिक व मानसिक छळ करून वैतागलेल्या बहिणीने घराजवळील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली.२३ वर्षांपूर्वी माझी बहीण सुनंदा हिचा विवाह शिवणगाव येथील लक्ष्मण वाळू रणमाळे बरोबर झाला. गेल्या २३ वर्षांत त्यांना तीन मुले नामे प्रकाश, नवल व चेतन यापैकी, प्रकाश हा मामा ज्ञानेश्वर यांच्याकडे नाशिक येथे राहतो. तर नवल व चेतन हे आईकडे म्हणजे सुनंदाकडे राहत असत. या फिर्यादीत पुढे असे म्हटले आहे की, सुनंदाकडे पती लक्ष्मण, सासू ठकूबाई, जेठ मनोहर व दीर पांडुरंग हे वारंवार पैशाची मागणी करीत असत. कर्ज द्यावयाचे आहे, खर्चाला पैसे मागणे यासाठी सासू ठकूबाईचा वारंवार तगादा असे. पैसे नाही आणले की, सासू आपल्या मुलाला एकाचे दोन करून मुलाला सांगत असे. त्यावरून पती लक्ष्मण हा सुनंदास नेहमीच मारहाण तसेच मानसिक, शारीरिक छळ करीत असे.याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक लोखंडे आदी करीत असून, अद्याप कोणासही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या