शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

बाजारात साहित्य भरमसाठ; बळीराजाने मात्र फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:08 IST

सलग तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागावर वरुणराजा रुसल्याने या परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळ व महागाईचा विपरीत परिणाम पूर्व भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वावीच्या आठवडे बाजारावर दिसून आला. पोळा सणाला बैलांसाठी साहित्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या व्यावसायिकांची यामुळे घोर निराशा झाली. बाजारात बैलपोळ्याचे साहित्य भरमसाठ प्रमाणात उपलब्ध होते; मात्र बळीराजाने त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देमहागाईमुळे बैलांसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी निरुत्साही

सिन्नर : सलग तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागावर वरुणराजा रुसल्याने या परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळ व महागाईचा विपरीत परिणाम पूर्व भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वावीच्या आठवडे बाजारावर दिसून आला. पोळा सणाला बैलांसाठी साहित्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या व्यावसायिकांची यामुळे घोर निराशा झाली. बाजारात बैलपोळ्याचे साहित्य भरमसाठ प्रमाणात उपलब्ध होते; मात्र बळीराजाने त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त असला तरी कष्टाळू व पशुप्रेमी शेतकऱ्यांनी मोठ्या दुष्काळातही आपले पशुधन सांभाळले आहे. आपल्या बैलांवर जिवापाड प्रेम करणारा बळीराजा मात्र सलगच्या तीन वर्षांपासून पडणाºया दुष्काळामुळे पुरता खचला असल्याचे दिसून आले. यामुळे बैलपोळ्याच्या बाजारात गर्दी दिसत होती; मात्र बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीवर विपरीत परिणाम दिसून येत होता.चारा व पाणीटंचाईमुळे अनेकांनी आपल्याजवळील बैलजोड्या कमी केल्या आहेत. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. बाजारात बैलांचे साहित्य खरेदी करण्याऐवजी काही शेतकरी मातीचे बैल खरेदी करताना दिसून येत होते. घरी बैलजोडी नसल्याने अनेक शेतकºयांना मातीच्या बैलांचे पूजन करून वृषभोत्सव साजरा करावा लागणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पोळ्याचा मोठा बाजार म्हणून वावीचा असणारा नावलौकिक दुष्काळ व महागाईमुळे कमी होऊ लागला आहे. बाजारात दरवर्षीप्रमाणे साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, शेतकरीही आले होते; मात्र बैलांचे सजावटीचे साहित्य पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाले नाही.बडा घर, पोकळ वासावावी येथील पोळ्याचा आठवडे बाजार तालुक्यातच नव्हे तरजिल्ह्यात मोठा मानला जातो. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील५० ते ६० गावातील शेतकरी या बाजारात बैलपोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे गावभर आठवडे बाजार विखुरला जातो. पोळ्याचे साहित्य विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली जाते. या रांगेत केवळ बैलपोळ्याचे साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते. खरेदीसाठी हजारो शेतकरी येत असल्याने साहित्य विक्रीसाठी जिह्यातीलच नव्हे तर राज्यभरातून दुकानदार येत असतात. सिन्नरसह कोपरगाव, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, वैजापूर, परळीवैजनाथ, बीड, औरंगाबाद आदींसह अन्य शहरातील दुकानदारांनी साहित्य विक्रीसाठी वावीच्या आठवडे बाजारात गर्दी केली होती. यावर्षी दुष्काळामुळे मात्र त्यांचा म्हणावा असा व्यवसाय झाला नाही. त्यामुळे त्यांना निराश होऊन परतावे लागले. बाजार मोठा असला तरी त्याची अवस्थामोठे घर, पोकळ वासा अशी झाली.बैलांच्या अंघोळीसाठी पाण्याचा प्रश्नसलग तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. यावर्षीही वरुणराजाने सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागावर वक्रदृष्टी केल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची वाट पाहावी लागते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीInflationमहागाई