शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात साहित्य भरमसाठ; बळीराजाने मात्र फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:08 IST

सलग तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागावर वरुणराजा रुसल्याने या परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळ व महागाईचा विपरीत परिणाम पूर्व भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वावीच्या आठवडे बाजारावर दिसून आला. पोळा सणाला बैलांसाठी साहित्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या व्यावसायिकांची यामुळे घोर निराशा झाली. बाजारात बैलपोळ्याचे साहित्य भरमसाठ प्रमाणात उपलब्ध होते; मात्र बळीराजाने त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देमहागाईमुळे बैलांसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी निरुत्साही

सिन्नर : सलग तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागावर वरुणराजा रुसल्याने या परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळ व महागाईचा विपरीत परिणाम पूर्व भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वावीच्या आठवडे बाजारावर दिसून आला. पोळा सणाला बैलांसाठी साहित्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या व्यावसायिकांची यामुळे घोर निराशा झाली. बाजारात बैलपोळ्याचे साहित्य भरमसाठ प्रमाणात उपलब्ध होते; मात्र बळीराजाने त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त असला तरी कष्टाळू व पशुप्रेमी शेतकऱ्यांनी मोठ्या दुष्काळातही आपले पशुधन सांभाळले आहे. आपल्या बैलांवर जिवापाड प्रेम करणारा बळीराजा मात्र सलगच्या तीन वर्षांपासून पडणाºया दुष्काळामुळे पुरता खचला असल्याचे दिसून आले. यामुळे बैलपोळ्याच्या बाजारात गर्दी दिसत होती; मात्र बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीवर विपरीत परिणाम दिसून येत होता.चारा व पाणीटंचाईमुळे अनेकांनी आपल्याजवळील बैलजोड्या कमी केल्या आहेत. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. बाजारात बैलांचे साहित्य खरेदी करण्याऐवजी काही शेतकरी मातीचे बैल खरेदी करताना दिसून येत होते. घरी बैलजोडी नसल्याने अनेक शेतकºयांना मातीच्या बैलांचे पूजन करून वृषभोत्सव साजरा करावा लागणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पोळ्याचा मोठा बाजार म्हणून वावीचा असणारा नावलौकिक दुष्काळ व महागाईमुळे कमी होऊ लागला आहे. बाजारात दरवर्षीप्रमाणे साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, शेतकरीही आले होते; मात्र बैलांचे सजावटीचे साहित्य पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाले नाही.बडा घर, पोकळ वासावावी येथील पोळ्याचा आठवडे बाजार तालुक्यातच नव्हे तरजिल्ह्यात मोठा मानला जातो. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील५० ते ६० गावातील शेतकरी या बाजारात बैलपोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे गावभर आठवडे बाजार विखुरला जातो. पोळ्याचे साहित्य विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली जाते. या रांगेत केवळ बैलपोळ्याचे साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते. खरेदीसाठी हजारो शेतकरी येत असल्याने साहित्य विक्रीसाठी जिह्यातीलच नव्हे तर राज्यभरातून दुकानदार येत असतात. सिन्नरसह कोपरगाव, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, वैजापूर, परळीवैजनाथ, बीड, औरंगाबाद आदींसह अन्य शहरातील दुकानदारांनी साहित्य विक्रीसाठी वावीच्या आठवडे बाजारात गर्दी केली होती. यावर्षी दुष्काळामुळे मात्र त्यांचा म्हणावा असा व्यवसाय झाला नाही. त्यामुळे त्यांना निराश होऊन परतावे लागले. बाजार मोठा असला तरी त्याची अवस्थामोठे घर, पोकळ वासा अशी झाली.बैलांच्या अंघोळीसाठी पाण्याचा प्रश्नसलग तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. यावर्षीही वरुणराजाने सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागावर वक्रदृष्टी केल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची वाट पाहावी लागते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीInflationमहागाई