शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जिल्ह्यातील बाजार समित्या सलग दहा दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:32 IST

दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहे.

ठळक मुद्देदिवाळी उत्सव : सणासुदीत शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा

नाशिक : दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहे. चांदवड बाजार समितीत शनिवारी सकाळच्यावेळी धान्य लिलाव सुरू राहणार आहेत. येथे ९ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत.

सलग दहा दिवस बाजार समित्या बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. दिवाळीनंतर बाजार समित्या सुरू झाल्यानंतर मालाची आवक वाढते. यामुळे त्याचा दरावर परिणाम होतो. आधीच मागील दोन वर्षांपासून शेतीमालाला फारसे दर नाहीत. मागील पंधरा दिवसांपासून कांदा दरावरही मोठा परिणाम झाला आहे. उन्हाळ कांदा संपत आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांना आता कांदा विक्रीसाठी किमान दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोट-

दिवाळी असली तरी सलग दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवणे हे उचित नाही. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची गरज असते, पण आता त्यांना माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक प्रकारे हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचाच प्रकार आहे. एक-दोन दिवस व्यवहार बंद ठेवणे समजण्यासारखे आहे, पण इतके दिवस बंद ठेवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. बाजार समिती प्रशासनाने ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - अर्जुनतात्या बोराडे, जिल्हाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी