शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यातील बाजार समित्या सलग दहा दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:32 IST

दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहे.

ठळक मुद्देदिवाळी उत्सव : सणासुदीत शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा

नाशिक : दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहे. चांदवड बाजार समितीत शनिवारी सकाळच्यावेळी धान्य लिलाव सुरू राहणार आहेत. येथे ९ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत.

सलग दहा दिवस बाजार समित्या बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. दिवाळीनंतर बाजार समित्या सुरू झाल्यानंतर मालाची आवक वाढते. यामुळे त्याचा दरावर परिणाम होतो. आधीच मागील दोन वर्षांपासून शेतीमालाला फारसे दर नाहीत. मागील पंधरा दिवसांपासून कांदा दरावरही मोठा परिणाम झाला आहे. उन्हाळ कांदा संपत आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांना आता कांदा विक्रीसाठी किमान दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोट-

दिवाळी असली तरी सलग दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवणे हे उचित नाही. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची गरज असते, पण आता त्यांना माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक प्रकारे हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचाच प्रकार आहे. एक-दोन दिवस व्यवहार बंद ठेवणे समजण्यासारखे आहे, पण इतके दिवस बंद ठेवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. बाजार समिती प्रशासनाने ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - अर्जुनतात्या बोराडे, जिल्हाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी