शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

बाजार समित्या बनल्या व्यापाऱ्यांच्या हातच्या बाहुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

नाशिक : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजर समितीत निर्माण झालेल्या व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीला चाप कसा ...

नाशिक : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजर समितीत निर्माण झालेल्या व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीला चाप कसा बसणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे सातशे अधिकृत व्यापारी म्हणून नोंद असलेल्या या बाजार समितीत निफाड आणि विंचूर उप बाजारासह केवळ २५० व्यापारीच प्रत्यक्ष कामकाज करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे लिलाव प्रक्रियेत स्पर्धा होण्याऐवजी व्यापाऱ्यांची मनमानीच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या या प्रकारची माहिती असूनही बाजार समिती प्रशासनही हतबल असून त्याही व्यापाऱ्यांच्या हातच्या बाहुल्या बनल्या आहेत. नवीन व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी झाला तर या ठिकाणी अनेक वाद निर्माण होतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

लासलगाव बाजार समितीत गेल्या गुरुवारी (दि.३) कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेने कांदा लिलावात सहभाग घेतल्यानंतर वाद उफाळून आला आणि लिलावाचे कामकाज बंद पडले. या निमित्ताने लासलगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीची पुन्हा नव्याने चर्चा होऊ लागली आहे. याबाबत बाजार समिती प्रशासन संचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर समितीही हतबल असल्याचे निदर्शनात आले आहे. शासनाचे मुक्त बजाराचे धोरणही याला बऱ्यापैकी कारणीभूत असल्याचे दिसते. बाजार समितीचा परवाना नसला तरी कुणालाही लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन माल खरेदी करता येऊ शकतो, असे नव्या धोरणात नमूद केलेले असल्यामुळे बाजार समित्यांचा व्यापाऱ्यांवर वचक राहिला नाही. याचाही परिणाम मक्तेदारी निर्माण होण्यावर होत आहे. लासलगाव बाजार समिती आणि विंचूर व निफाड या उप बाजारासह एकूण सातशे नोंदणीकृत व्यापारी आहेत. प्रत्यक्षात कामकाज करताना लासलगावी १२०, विंचूर येथे ८० आणि निफाड येथे अवघे २६ व्यापारी सहभागी होत असतात. वर्षानुवर्षे तेच तेच व्यापारी असल्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण झाली असून ते मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

चौकट

स्थानिक राजकारणही कारणीभूत

लासलगाव बाजार समितीत स्थानिक राजकारणाचे पडसाद अनेक वेळा उमटत असतात. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली तर विरोधक काही वेळा व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. यातूनही व्यापाऱ्यांना अधिक बळ मिळते. पर्यायाने मनमानी कामकाजाला चालना मिळते यासाठी बाजार समिती अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

चौकट

अनेक अनिष्ट पद्धती रूढ

लासलगाव बाजार समितीत नवीन व्यापारी लिलावात सहभागी झाला तर व्यापारी असोसिएशनकडून त्याला विरोध दर्शविला जातो. सदर व्यापारी असोसिएशनचे सभासद नसल्याचे सांगितले जाते. काही वेळा नव्या व्यापाऱ्यांना किमान तीन वर्षे जुन्या व्यापाऱ्यांच्या अंतर्गत काम करावे लागते. यासाठी त्यांच्याकडून तीन टक्के रक्कम कापली जाते. ही एक प्रकारे नव्यांची अडवणूकच असते. लासलगाव बाजार समितीत एका व्यापाऱ्याने तब्बल पंधरा वर्षे अशा प्रकारे काम केल्यानतर दोन वर्षांपासून त्याला आता थेट कामकाजात सहभागी होता येऊ लागले आहे, असा किस्सा एका संचालकाने सांगितला.

कोट

व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहेच हे नाकारून चालणार नाही; पण शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून काही बाबींकडे दुर्लक्ष करावे लागते. याबाबत उपाययोजना केल्या जातात. अनेक वेळा व्यापाऱ्यांचे परवानेही रद्द केले जातात; पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. जिल्हा उपनिबंधकांनी यात हस्तक्षेप करण्याबाबत चर्चा झाली आहे.

- शिवनाथ जाधव, संचालक, लासलगाव बाजार समिती

कोट-

कागदपत्रे सादर केल्यानंतर आमच्या संस्थेला कांदा खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. स्पर्धा वाढण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना लिलावात सहभागी करायला हवे. तरच मक्तेदारी मोडीत निघेल.

- साधना जाधव, संचालक, कृषी साधना

कोट-

लिलाव प्रक्रिया सुरळीत राहावी, असे बाजार समितीचे धोरण असल्यामुळे काही वेळा मकतेदारीकडे दुर्लक्ष करावे लागते. नव्या व्यापाऱ्यांचा एक मोठा समूह तयार झाला तरच अशा प्रकारांना आळा बसेल. शासनाचे खुल्या व्यापाराचे धोरण हे अडचणीत टाकणारे आहे.

- नरेंद्र वावधने, सचिव, लासलगाव बाजार समिती