शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 01:31 IST

बाजार समित्यांची निवडणूक घेण्यापुर्वी सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादी जाहीर करण्याचा व त्यावर हरकती मागविण्याचा कार्यक्रमही बंद करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता सर्वप्रथम सोसायट्यांची निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्देइच्छुकांचा हिरमोड : अगोदर होणार सोसायट्यांची निवडणूक

नाशिक : बाजार समित्यांची निवडणूक घेण्यापुर्वी सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादी जाहीर करण्याचा व त्यावर हरकती मागविण्याचा कार्यक्रमही बंद करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता सर्वप्रथम सोसायट्यांची निवडणूक होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रीया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. आता मात्र ही सारी प्रक्रीयाच रद्द ठरली आहे. राज्यातील ज्या बाजार समित्यांची मुदत २३ ऑक्टोंबर २०२१ पुर्वी संपुष्टात आल्या आहेत अशा बाजार समित्यांची निवडणूक घेण्याची घोषणा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने केली होती व त्यासाठी बाजार समित्यांना निवडणूक मतदार यादी तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. साधारणत: जानेवारीत निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत बाजार समित्यांच्या निवडणुकीत सोसायटी गट असून, कोरोनामुळे बहुतांशी सोसायट्यांच्या निवडणूका झालेल्या नाहीत तसेच ग्रामपंचायतीच्याही निवडणूक झालेल्या नाहीत त्यामुळे या गटातील सदस्यांना मतदानापासून वंचित रहावे लागणार असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने अगोदर सोसायट्यांच्या निवडणुका व नंतर बाजार समित्या असा निर्देश दिला. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत.

चौकट===

पुन्हा मुदतवाढ की प्रशासक?

बाजार समित्यांची मुदत गेल्या वर्षीच संपुष्टात आली असून, विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली आहेे. बाजार समिती कायद्यानुसार संचालक मंडळास दोनच वेळा मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. यापुर्वीच दोन मुदतवाढ देण्यात आली असल्याने २३ ऑक्टोबर अखेर मुदत संपुष्टात आलेली आहे. आता निवडणुकीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याने बाजार समितीवर प्रशासक की पुन्हा मुदतवाढ असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक