शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पालेभाज्यांची आवक घटल्याने नाशिकमध्ये बजारभाव तेजीत

By श्याम बागुल | Updated: September 13, 2018 15:12 IST

कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : शेतमालाचे उत्पादन घटले शेतातील पिकांना पाणी कमी पडत असून त्याचा परिणाम उत्पादनावर

नाशिक: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर जाणवला आहे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मेथी, कोथिंबीरसह अन्य सर्वच पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. गुरूवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर जुडीला ५० रुपये तर मेथीला २५ रुपये असा बाजारभाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुर्णपणे उघडीप दिलेली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडत असून त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. शेतमालाची आवक घटल्याने त्याचा परिणाम सर्वच प्रकारच्या पालेभाज्या बाजारभावावर झाला आहे परिणामी बाजारभाव तेजीत आलेले आहेत मागील दोन-तीन दिवसांपूर्वी कोथंबीर प्रति जुडीला ८० रुपये पर्यंत बाजार भाव मिळालेला होता. गुरूवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर ५० रुपये, कांदापात २५, मेथी २५ तर शेपू १५ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक