शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा पाणीप्रश्नावर भाजपा एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 01:55 IST

नाशिकच्या पाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षांची मंगळवारी बैठक : भाजपावर जोरदार टीका

नाशिक : नाशिकच्यापाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.यासंदर्भात मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयात सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यात मराठवाड्याला पाणी देण्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्णातून पाण्याची मागणी केली जात आहे. त्यास नगर जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध दर्शविल्याने त्याच धर्तीवर नाशिकचे पाणी पुन्हा पळवू न देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येत आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे. गंगापूर धरणात आधीच पाणी साठा कमी आहे. त्यात मराठवाड्याला पाणी दिल्यास नाशिकवर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. यामुळे २०१६ मध्ये सर्वपक्षीय नाशिककरांनी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच पुन्हा एकत्र येऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली. येत्या मंगळवारी पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन वस्तुस्थिती तपासली जाणार असून, न्यायालयाच्या आडून शासन धाक दाखवत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना मराठवाड्याला सिंचनासाठी का पाणी द्यायचे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. नाशिकबाबत शासन नेहमीच टोकाचा भेदभाव करत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून, नाशिकला कुणीच वाली नसल्यामुळे धरणातून पाणी पळवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे असे होऊ नये यासाठी नाशिककरांसाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडणार असल्यानेच सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधी पाणीविषयक नाशिककरांची बाजू घेऊन ढोंग करत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे नाशिकवर पूतना मावशीचे प्रेम आहे. औरंगाबादसह परिसरातील बिअर व मद्याच्या कारखान्यांना पाणी देण्यासाठी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, नाशिककर तो प्रयत्न हाणून पाडतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला. सत्ताधारी नाशिककरांची घोर फसवणूक करत आहे. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न आहे. वस्तुस्थिती नजरेआड करून मराठवाड्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी सांगितले. पाणीप्रश्नी शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे, भारिप, रिपाइं, भाकप, माकप, बसपा यांसह सर्व पक्ष एकत्रित लढा देणार असल्याचे सांगण्यात आले.आमदारांचा खरपूस समाचारआमदार देवयानी फरांदे यांनी मराठवाड्यास पाणी देण्यास विरोध दर्शवित सर्वपक्षीयांची मोट बांधून विरोध करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर विरोधी पक्षांनी आमदार फरांदे यांचा खरपूस समाचार घेतला. आधी तीन आमदार आणि शहर भाजपाची मोट नीट बांधा मग सर्वपक्षीयांची मोट बांधा, असा सल्ला बोरस्ते यांनी दिला. २०१६ मध्ये सर्वपक्षीय लढा देत असताना भाजपाने स्वत:ला दूर ठेवले. आता पालकमंत्री जलसंपदा खात्याचे मंत्री आहे. यामुळे त्यांनी पालकत्व निभवावे. आमदार सत्ताधारी असल्याने त्यांनी नाशिकची बाजू भक्कमपणे मांडून न्याय द्यावा. आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी पॅकेजची घोषणा करण्याऐवजी तिथलेच पाणी पळविले जात असल्याचे बोरस्ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी