शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मराठवाडा पाणीप्रश्नावर भाजपा एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 01:55 IST

नाशिकच्या पाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षांची मंगळवारी बैठक : भाजपावर जोरदार टीका

नाशिक : नाशिकच्यापाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.यासंदर्भात मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयात सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यात मराठवाड्याला पाणी देण्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्णातून पाण्याची मागणी केली जात आहे. त्यास नगर जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध दर्शविल्याने त्याच धर्तीवर नाशिकचे पाणी पुन्हा पळवू न देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येत आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे. गंगापूर धरणात आधीच पाणी साठा कमी आहे. त्यात मराठवाड्याला पाणी दिल्यास नाशिकवर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. यामुळे २०१६ मध्ये सर्वपक्षीय नाशिककरांनी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच पुन्हा एकत्र येऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली. येत्या मंगळवारी पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन वस्तुस्थिती तपासली जाणार असून, न्यायालयाच्या आडून शासन धाक दाखवत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना मराठवाड्याला सिंचनासाठी का पाणी द्यायचे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. नाशिकबाबत शासन नेहमीच टोकाचा भेदभाव करत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून, नाशिकला कुणीच वाली नसल्यामुळे धरणातून पाणी पळवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे असे होऊ नये यासाठी नाशिककरांसाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडणार असल्यानेच सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधी पाणीविषयक नाशिककरांची बाजू घेऊन ढोंग करत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे नाशिकवर पूतना मावशीचे प्रेम आहे. औरंगाबादसह परिसरातील बिअर व मद्याच्या कारखान्यांना पाणी देण्यासाठी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, नाशिककर तो प्रयत्न हाणून पाडतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला. सत्ताधारी नाशिककरांची घोर फसवणूक करत आहे. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न आहे. वस्तुस्थिती नजरेआड करून मराठवाड्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी सांगितले. पाणीप्रश्नी शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे, भारिप, रिपाइं, भाकप, माकप, बसपा यांसह सर्व पक्ष एकत्रित लढा देणार असल्याचे सांगण्यात आले.आमदारांचा खरपूस समाचारआमदार देवयानी फरांदे यांनी मराठवाड्यास पाणी देण्यास विरोध दर्शवित सर्वपक्षीयांची मोट बांधून विरोध करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर विरोधी पक्षांनी आमदार फरांदे यांचा खरपूस समाचार घेतला. आधी तीन आमदार आणि शहर भाजपाची मोट नीट बांधा मग सर्वपक्षीयांची मोट बांधा, असा सल्ला बोरस्ते यांनी दिला. २०१६ मध्ये सर्वपक्षीय लढा देत असताना भाजपाने स्वत:ला दूर ठेवले. आता पालकमंत्री जलसंपदा खात्याचे मंत्री आहे. यामुळे त्यांनी पालकत्व निभवावे. आमदार सत्ताधारी असल्याने त्यांनी नाशिकची बाजू भक्कमपणे मांडून न्याय द्यावा. आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी पॅकेजची घोषणा करण्याऐवजी तिथलेच पाणी पळविले जात असल्याचे बोरस्ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी